अनेक समस्या असतील तर श्री स्वामी समर्थांचे हे उपाय अवश्य करा

आपल्याला अनेक अडचणी येत असतात, दु:ख, भिती, चिंता,काळजी, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटुन असते, काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही. अशावेळी सकारात्मक व्हावे, नामस्मरणाची शक्ती अनुभवावी. श्री स्वामी समर्थांचा जप आणि सेवा केल्याने लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला असतो. तर आपल्या अनेक अडचणी लवकर दूर व्हाव्या याकरीता हे उपाय करून पाहा.

दररोज घरात श्री सूक्त पठन केले असता, त्या घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही. लाल रंगाच्या रिबिनमधे तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेश द्वारावर बांधल्यास घरात सुखशांति व धनाची वाढ होते. प्रत्येक गुरुवारी तूळशीस दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो.

नोकरी, व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरूचरीत्राचा दहावा अध्याय दररोज वाचावा. कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याचवेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवनाथ ग्रंथाचा तीसरा व श्री गुरूचरीत्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा.

ज्या घरात एक तरी भक्तीवान व नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटूंबीय केवळ त्याच्यामुळे तरून जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदोष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटूंबास सतत संकटांना सामोरे जावे लागते, शक्य असल्यास श्री स्वामी समर्थांचा जप किंवा तारक मंत्र नियमीत बोला, किंवा रेकॉर्डींग सुरू ठेवा.

स्वयंपाक करतेवेळी किंवा इतर महत्वाच्या कामांवेळी सतत नामस्मरण करावे. मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो. उच्चार करण्याआधी विचार करतो. म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा करणीभूत होतो. विचार हा सुविचार होण्याला ध्यान-चिंतनाची आवश्यकता फार असते, म्हणून ध्यानधारणा मननचिंतन याला फारच महत्त्व आहे.

अनेकवेळा कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा इतर अडचणींमुळे रात्री शांत झोप लागत नाही. अशावेळी आपल्या इष्टदेवतेचे किंवा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे. यासोबतच ज्ञानेश्वरी या ग्रंथातील १२ व्या अध्यायातील पहिल्या १६ ओळी वाचाव्या. शांत झोप लागेल.

Leave a Comment