रोज तीन माळ करा या प्रभावी मंत्राचा जप! तुमच्या सर्व अडचणी होतील दूर 

 

 

मित्रांनो, प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नये तसेच आपले जीवन सुखी समाधानाचे राहावे यासाठी घरातील असणाऱ्या देवी देवतांची अगदी विधीवत पूजा अर्चना करीत असतात. प्रत्येक जण हे वेगवेगळ्या देवी देवतांचे भक्त असतात. कोण स्वामी समर्थांचे, कोण गणेशांचे, तर कोण महादेवांचे. प्रत्येक भक्ताला आपल्या देवतांवर विश्वास हा असतोच. परंतु काही वेळेस आपल्याला भरपूर पूजा पाठ करून देखील काहीच फरक पडत नाही. म्हणजे त्यांचे म्हणणे असे असते की मी एवढे पूजा करतो देव देव करतो तरी देखील माझ्या जीवनातील अडचणी का कमी होत नाहीत.

 

तर मित्रांनो तुम्हाला देखील सतत काही ना काही अडीअडचणी येत असतील, संकटे येत असतील, कोणत्याही कामांमध्ये यश प्राप्त होत नसेल तर आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे. हा खूपच प्रभावशाली आणि चमत्कारिक असा मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्ही दररोज तीन माळ केला तर यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. तर हा प्रभावशाली मंत्र नेमका कोणता आहे चला तर जाणून घेऊयात.

 

तर मित्रांनो तुम्ही इतर कोणत्याही सेवा करत असाल तर त्या सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप देखील करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्ही तीन माळ करायचा आहे. घरातील महिला पुरुष कोणीही ही सेवा करू शकतात. तर तुम्ही या मंत्राचा जप कमीत कमी तीन महिने करायचा आहे. म्हणजेच ही सेवा तुम्हाला तीन महिने न चुकता दररोज करायचे आहे. जेवढे दिवस वाटेल तेवढे दिवस तुम्ही ही सेवा करू शकता.

 

परंतु तुम्हाला तीन माळ मंत्र जप करणे गरजेचे आहे. तर हा प्रभावशाली मंत्र पिसा असा आहे

“ओम विष्णुप्रियाय नमो नमः” ओम विष्णुप्रियाय नमो नम: म्हणजेच हा लक्ष्मीचा मंत्र आहे. या मंत्रामध्ये विष्णूचे वर्णन केलेले आहे. जिथे विष्णूंची पूजा तसेच मंत्र जप होतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी नक्कीच वास करते. त्यामुळे या मंत्रात तुम्ही विष्णूंचे स्मरण करायचे आहे. यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचेही स्मरण या मंत्रामध्ये होते.

 

दररोज तुम्हाला न चुकता तीन माळ या मंत्राचा करायचा आहे. सलग जर तीन महिने तुम्ही ही सेवा चालू ठेवली तर तुमच्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. संकटे नाहीशी होतील. तर या प्रभावशाली मंत्राचा जप तुम्ही देखील आवश्य करा.

Leave a Comment