इच्छित फलप्राप्तीसाठी पुजेसोबत करा ‘हा’ मंत्रजाप, सर्व समस्या होतील दूर!

हिंदू धर्मग्रंथांमध्ये देवतांच्या पूजेला खूप महत्त्व दिले गेले आहे. योग्य प्रकारे पूजा केल्याने देवता प्रसन्न होतात आणि पत्रिकेतील ग्रहांचे अडथळेही दूर होतात. पण पूजेसोबत मंत्रांचा जप हाही एक उत्तम उपाय मानला गेला आहे. मान्यतेनुसार, मंत्र जपल्याने किंवा श्रवण केल्याने मनुष्याला शक्ती प्राप्त होते. हे मंत्र खूप चमत्कारिक आणि प्रभावी आहेत. मंत्रांचा खर्‍या मनाने जप केल्यास धन, आजार, गृहस्थी इत्यादी सर्व त्रास दूर होतात. जाणून घेऊया काही सिद्ध मंत्रांबद्दल, जे एखाद्या विशिष्ट समस्येमध्ये खूप प्रभावी मानले जातात.

जर तुमच्या जीवनात अनेकदा अडचणी येत असतील, प्रत्येक कामात अडथळे येत असतील आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही बजरंगबलीच्या मंत्राचा जप करावा. त्याच्या कृपेने शनि आणि मंगळाचे दोष दूर होतात आणि हनुमानजींच्या आशीर्वादाने सर्व संकटे दूर होतात. तो मंत्र काहीसा असा आहे
ॐ ॐ ऐं भ्रीं हनुमते श्रीराम दूताय नम:।।

जर तुम्ही नवीन काम सुरू करत असाल आणि त्यात यश मिळवायचे असेल तर बाधा दूर करण्यासाठी गणपतीच्या मंत्राचा जप करा. असे केल्याने कार्यात यश आणि शुभ प्राप्ती होते. या मंत्राने कोणतेही काम सुरू करा, कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तो मंत्र म्हणजे
ॐ गं गणपतये नमः।।

जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर दररोज भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा. याचा जप केल्याने सौभाग्य वाढते आणि मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भगवान विष्णू प्रसन्न झाल्यावर सांसारिक सुख-समृद्धी वाढते. तो मंत्र आहे
ॐ नमो: भगवते वासुदेवाय।

जर तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल आणि लाख प्रयत्न करूनही सावरता येत नसेल तर भगवान शिवाच्या मंत्राचा जप करा. असे केल्याने कर्जही निघून जाते आणि पैशाची कमतरताही दूर होते. यासोबत मंगळवारी कर्जमुक्ती स्तोत्राचे पठण करावे. तो स्त्रोत आहे.
ॐ रिनामुक्तेश्वर महादेवाय नमः।

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment