शनिवारच्या दिवशी नक्की करा ही स्वामी सेवा, जे हवे ते सगळे मिळेल!

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची सेवा पूजा च्या अगदी मनापासून आपल्या घरामध्ये दररोज करत असतात आणि त्याचबरोबर आपल्यापैकी काही जण हे स्वामींचे अनेक नामस्मरण आणि जप करत असतात यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे मित्रांनो त्यांना स्वामीवर अतिशय दृढ विश्वास आहे. ते आपली नीतिनियमांची स्वामींची सेवा करीत असतात.तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर मी आज एक तुम्हाला स्वामींचा असाच काही एक मंत्र सांगणार आहे तो तुम्हाला तुमच्या नित्य नियमाच्या सेवेबरोबर बोलायचा आहे.

स्वामी समर्थांचे काही भक्त नित्यनियमाने पूजा सेवा करीत असतात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी पारायण करतात सेवा पारायण हे खूप विधीपूर्वक आणि शास्त्रोक्त प्रमाणे आणि नियमांचे पालन करून करावे लागते. आपल्या आयुष्यात अनेकदा अडचणी येत असतात त्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला स्वामी समर्थांची मनोभावे आणि भक्तिभावाने सेवा केली पाहिजे ज्यामुळे आपले आयुष्य उज्ज्वल होईल सेवा पारायण केल्याने स्वामी समर्थांची आपल्यावर कृपा राहील त्यामुळे आपण स्वामी समर्थांची आराधना केली पाहिजे स्वामी समर्थांची सतत सेवा केली पाहिजे.

आणि त्याचबरोबर नित्यनेमाची सेवा केल्यानंतर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी हा मंत्र बोलायचा आहे. हा खूपच प्रभावशाली मंत्र आहे.घरातील कोणत्याही व्यक्तीने हा मंत्र बोलला तरीदेखील चालतो. तुम्हाला हा मंत्र सकाळी किंवा संध्याकाळी बोलायचा आहे. सकाळची तुमची स्वामींची नित्याची सेवा आटोपल्यानंतर कधीही तुम्ही हात पाय स्वच्छ धुऊन देवघरासमोर तुम्हाला बसायचे आहे. दिवा, अगरबत्ती लावायची आहे आणि या मंत्राचा एकवीस वेळेस जप करायचा आहे. तो मंत्र कोणता आहे, चला तर मग पाहूया कोणता आहे तो मंत्र,

श्री अक्कलकोट स्वामी समर्थय नमः श्री अक्कलकोट स्वामी समर्थय नमः

मित्रांनो, हा मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अष्ट नामावली या ग्रंथांमधील आहे. स्वामींचे जे १०८ नावे आहेत, मंत्र आहेत त्यातील हा एक प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र बोलताना कोणतीही घाई गडबड करायची नाही. अगदी शांतमनाने, श्रद्धेने या मंत्राचा एकवीस वेळेस तुम्हाला जप करायचा आहे. या मंत्राचा जप तुम्हाला जर सकाळी वेळ असेल तर सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी दिवा, अगरबत्ती लावण्याच्या वेळेस देखील हा मंत्र जप केला तरी चालेल.

तर मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचा हा प्रभावशाली मंत्र जप केल्याने आणि त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी स्वामी समर्थांची व सांगितल्याप्रमाणे सेवा जर तुम्ही अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने केली तर यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊन आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment