6 जुलै मोठा गुरुवार स्वामींची विशेष सेवा; फक्त 21 वेळा बोला हा मंत्र!

मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की गुरुवार हा दिवस स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या साठी खूप प्रिय असतो आणि म्हणूनच आपल्यातील बरेच जण या दिवशी स्वामी समर्थांना व गुरुदेव दत्त यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात यामध्ये हे लोक सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जातात आणि आपली देवघरातील दररोजची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात यामध्ये प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान व अभिषेक घालतात आणि त्यानंतर त्यांना फुले अक्षता वाहतात आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवतात.

परंतु मित्रांनो स्वामी समर्थांची वरील पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर आपल्याला गुरूवारच्या दिवशी स्वामी समर्थांची एक विशेष सेवा करायची आहे, ही विशेष सेवा करत असताना आपल्याला यामध्ये महादेवांच्या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो स्त्री पुरुष लहान मुले किंवा वृद्ध यांच्यातील कोणीही व्यक्ती ने या विशेष मंत्राचा जप केला तरी चालेल फक्त ही सेवा आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वासने आणि करायची आहे.
मित्रांनो ह्या मंत्राचा तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केव्हाही केला तरी चालेल.

जर तुम्ही सकाळच्यावेळी स्वच्छ स्नान करून जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा घरातील देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थाच्या प्रतिमेसमोर बसून या मंत्राचा जप केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय धुऊन जेव्हा तुम्ही तुमच्या तुळशीपाशी दिवा अगरबत्ती लावता त्या वेळी केला तरीही चालेल, परंतु गुरूवारच्या दिवशी तुम्हाला या विशेष मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राच्या जप करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी समर्थांकडे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे घरात सुख समृद्धी नांदुदे आणि घरातील संपत्तीत वाढ होऊ दे यासाठी.

स्वामींकडे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला हा विशेष मंत्राचा जप करायचा आहे, मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,
ओम श्री भस्मभूताय नमः , ओम श्री भस्मभूताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला फक्त एकवीस वेळा अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. एकवीस वेळा पेक्षा जास्त वेळा किंवा कमी वेळा तुम्हाला या मंत्राचा उपयोग करायचा नाही, अगदी योग्य पद्धतीने एकवीस वेळाच या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ किंवा अगदी दोन्ही वेळा तुम्ही गुरूवारच्या दिवशी या विशेष मंत्राचा जप करू शकता.

मित्रांनो या चमत्कारी मंत्राचा जप तुम्ही एकवीस वेळा गुरुवारच्या दिवशी केला तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनात असलेल्या सर्व समस्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. म्हणूनच 6 जुलै या गुरुवारच्या दिवशी तुम्ही या विशेष मंत्राचा जप नक्की करा.

Leave a Comment