जुळून आला भद्रा राजयोग! या राशींसाठी लाभणार अगणित संपत्ती!

वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांपैकी बुध, शुक्र, मंगळ, शनी ही महत्त्वाची ग्रह आहेत. यातील ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह या राशीच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. बुध ग्रह हा वाणी, गणित, शिक्षण, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. नुकतेच बुध स्वराशी मिथुन राशीत प्रवेश केल्यामुळे अतिशय शुभ राजयोग जुळून आला आहे.

तब्बल 50 वर्षांनंतर असा योगायोग तयार झाला आहे. बुध परिवर्तनामुळे भद्र राजयोग जो महापुरुष राजयोगा एवढ्या शुभ मानला जातो. भद्रा राजयोग हा तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात बुध ग्रह मिथुन किंवा कन्या राशीत असतो तेव्हा भद्र राजयोग तयार होत असतो. त्याशिवाय जेव्हा कुंडलीत सूर्य आणि बुध एकमेकांना भेटतात तेव्हा बुधादित्य योग जुळून येतो.

मिथुन
बुध संक्रमणामुळे तयार झालेला भद्रा राजयोगाचा सर्वाधिक फायदा मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे. करिअरमध्ये यशाची पायरी चढणार आहेत. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या मालामाल होणार आहेत. माध्यम, लेखन किंवा कला क्षेत्राशी संबंधित लोक यांना यश प्राप्त होणार आहे. नवीन ओळखी भविष्यात फायदाची ठरणार आहे.

तूळ
या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. बाहेर जाण्याचा योग जुळून आला आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे.

धनु
भद्रा राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी नशिब पालटणारा ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी सर्वाधिक लाभदायक हा काळ असणार आहे. नवीन प्रकल्प आणि करार होणार आहेत. अविवाहितांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे.

Leave a Comment