स्वामी म्हणतात : काही गोष्टींचा विचार करणे आज सोडून द्या 

 

 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आपल्या जीवनात आपण अनेक विचार करत असतो. पण गोष्टींचा विचार करणे आजच सोडून द्या दोन मिनिट हे वाचा खरंच तुमचे जीवन याने खूप आनंदी होईल.

 

स्वामींचा संदेश समजा त्याला कोणीतरी सांगितलेला उपाय समजा बरोबर भरपूर गोष्टीचा विचार करतात. मित्र-मैत्रिणींनो बराचसा वेळेस महिला असो अगर पुरुष असो किंवा घरातील कर्ता पुरुष असून ते भरपूर गोष्टींचा विचार करतात . आज काय होईल उद्या काय होईल याचे काय होईल त्याचे काय होईल. अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून, विचार करून करून माणसाचे आरोग्य खराब होते. त्याला बीपी हाय बीपी असे अनेक आजार होतात. त्यामुळे तो संपूर्ण जीवन जगू शकत नाही.

 

श्री स्वामी समर्थ म्हणतात की आजच्या दिवसात जगा उद्या काय होईल ते उद्या बघा आज तुम्ही आनंदी पाहिजे .आज तुम्ही सुखात जगले पाहिजे. कारण आजच  दिवस तुमचा वाईट जाईल आणि उद्याचा दिवस तुमच्या आयुष्यातच नसेल तर मग काय उपयोग त्या विचारांचा काय उपयोग ते टेन्शन घेऊन काय उपयोग आपले आरोग्य खराब करून तर उद्याचा दिवस आपला आयुष्यात नसेल म्हणून उद्या काय होईल ते कोणीही सांगू शकत नाही कुणीही ठरवू शकत नाही.

 

रात्री माणूस झोपेल तो सकाळी उठेल का नाही. ते सुद्धा कोणी सांगू शकत नाही. म्हणून आजची वेळ जी तुमच्या हातात आहे.  तुम्ही ठरवत आहात तुम्हाला काय करायचे आहे काय करायचे नाही म्हणून तुम्ही ठरवा मला आनंदी राहायचं आहे मला सुखी राहायचं आहे. परिवाराबरोबर आनंदी वेळ घालवायचा आहे.

 

कोणालाही नाराज करायचं नाही स्वतः नाराज व्हायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही आरोग्य खराब करायचं नाहीये आणि फालतू गोष्टींचा तर विचार अजिबात करायचा नाही. उद्या काय करायचे ते मी उद्या विचार करेन पण मी आजचा दिवस खराब करणार नाही उद्यासाठी उद्याचं उद्या बघेन रात्रीचे रात्री बघेन आता जो माझ्याकडे वेळ आहे.

 

तो मी आनंदात सुखात जगेन परिवाराला सुखात ठेवीन त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण घालवे विचार करून वाईट विचार करून फालतू विचार करून माझा दिवस माझी आजची वेळ वाया घालवणार नाही म्हणून मित्र-मैत्रिणींना उद्या काय होईल ते कोणी सांगू शकत नाही बरीचशी माणसं रात्री झोपतात सकाळी उठत नाहीत म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्य तुमचे जीवन अजिबात खराब करून घेऊ नका.

 

टेन्शन घेऊन विचार करून हाय बीपी लो बीपी असे आजार स्वतःला लावून घेऊ नका. आजचे हे जीवन खूप किमती आणि महत्त्वाचे आहे कारण माणसे हार्ट अटॅक येऊन जीवन सोडत आहेत. पण आपल्याला ती गोष्ट स्वीकारायची नाही आहे. ती गोष्ट आपल्या हातात नाहीये आपल्या हातात फक्त आनंदी राहणे आहे सुखी राहायचं कितीही टेन्शन असले तर जीवनात कितीही लोक आहेत श्रीमंत असो गरीब काही ना काही टेन्शन प्रत्येकालाच असतं प्रत्येकाच्या इच्छा असतात. प्रत्येकाला काय नाही काय हवं असतं ते होईल ते होत राहील जीवन आपल्या हातात नाही. वेळ आपल्या हातात नाही जी वेळ आहे ती ही आहे आज आहे आत्ता आहे आज मध्ये जगा

Leave a Comment