तुमच्याही घरात सतत चिडचिड, कटकट, वादविवाद, आजार असतील तर करा हा उपाय!

मित्रानो, तुमच्या घरातील कोणतीही वाईट शक्ती असेल, इडा पिडा असतील, दोष असेल किंवा तुमची कामे पूर्ण होत नसतील, कोणतेही काम तुम्ही मेहनतीने करत असाल तरी ते कामात तुम्हाला यश मिळत नसेल,तर तुम्ही कोणत्याही एका दिवशी एक वाटी मीठ तुमच्या घरा मध्ये या ठिकाणी ठेवा.

आता हे मीठ तुमच्या घरातील जे आपण स्वयंपाकामध्ये वापरत असतो तेच मीठ घेतले तरी चालेल. पण जर खडे मीठ घेतले तर अति उत्तम असते. कारण मित्रांनो आपण स्वयंपाक वापरणाऱ्या मिठापेक्षा हे खडे मीठ म्हणजेच काळे मीठ अतिशय प्रभावी आणि गुणकारी असते त्यामुळे शक्यतो याचाच वापर आपण या उपायासाठी करायचा आहे आणि मित्रांनो हे आपल्याला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध होईल.

परंतु खडे मीठ तुम्हाला मिळाले नाही किंवा तुम्ही घेऊ शकत नसाल तर घरामधील आपण जे स्वयंपाकासाठी, जेवणासाठी मीठ वापरत असतो ते मीठ तुम्ही घेतले तरी चालेल. वाटी कोणती घ्या. स्टीलची, प्लास्टिकची, काचेची कोणतीही वाटी तुम्ही घेऊ शकता. काचेची वाटी घेतली तर अतिउत्तम.

आता एक वाटी मीठ घेऊन तुम्हाला कोणत्याही दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळी हे मीठ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाक घरामध्ये ठेवायचं आहे. किचनमध्ये स्वयंपाक घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं की, जिथे कुणाचा पाय, हात लागणार नाही. आणि साहजिकच कोणाला दिसणार नाही म्हणजे तुम्हाला ते लपवून ठेवायचं आहे.

मग तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरच्या मागे ठेऊ शकता किंवा अन्य कोणत्या तरी सामानाच्या आड किंवा मागे लपवून ठेवू शकता. हे मीठ तुम्ही 7 दिवसापर्यंत ठेवायचे आहे आणि 7 दिवस पूर्ण झाल्यानंतर ते मीठ एका पाण्यामध्ये मग ते पाणी तुम्ही एखाद्या बकेटमध्ये घ्या किंवा एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि त्या पाण्यामध्ये ते वाटेभर मीठ टाकून द्यायचं.

मीठ आणि पाणी एकत्रित झालं म्हणजे मीठ वितळले की, ते पाणी आपल्या घराच्या बाहेर टाकून द्यायचा आहे. अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. याने आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती असतात, पिडा असतात, दोष शकतात, नकारात्मकता असतात.

त्या मिठामध्ये येतात आणि 7 दिवसानंतर आपण जेव्हा ते मीठ पाण्यात टाकून बाहेर फेकतो तेव्हा आपल्या घरातून सर्व वाईट शक्ती, सर्व नकारात्मकता, इडा पिडा, दोष घरातून निघून जातात. तुम्ही दर गुरुवारी सुद्धा शकता किंवा कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी चालेल. मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही हा उपाय दररोज संध्याकाळच्या वेळी केला तर यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील.

त्याचबरोबर घरामध्ये असणारे दोष किडा ही नष्ट होतील तर मित्रांनो तुमच्याही घरामध्ये काही दोष किंवा नकारात्मकता निर्माण झाली असतील तर अशावेळी तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करा आणि तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता पूर्णपणे संपवा परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे.

Leave a Comment