तुमच्याही घरात जपमाळ नाही तर मग स्वामींचा नाम जप कसा करायचा?

मित्रांनो आपण रोज सकाळी देवपूजा झाल्यावर जपमाळ करत असतो. जपमाळ केल्यामुळे आपल्याला मन प्रसन्न होते व आपले मन एकाग्र होऊन जाते. जपमाळ केल्यामुळे घरातले वातावरण प्रसन्न होते व घरात सुख शांती समाधान वाटते. काही लोकांना जप माळ केल्याशिवाय करमत नाही. कारण जपमाळ आपण रोज करतो त्यामुळे आपल्यालाही सवय झालेली असते की ,एक दिवस जर जपमाळ नाही केलं तर आपल्याला असं चुकलं चुकलं असे काहीसे वाटू लागते.

घरात कोणत्याच गोष्टीची कमी भासत नाही सतत होणारी भांडणे , चिडचिड वादविवाद हे सगळे काही निघून जातील. जर आपण जपमाळ मनापासून व श्रद्धेने केली तर खरच त्याचा आपल्याला लाभ हा नक्कीच मिळतो. तसेच ,जप माळ करताना आपले मन प्रसन्न व मनात कोणताही विचार न आणता शांतपणे ही जपमाळ करावी.

मित्रांनो जपमाळ हि विविध प्रकारची असू शकते. जसे की तुळशीची, रुद्राक्ष आणि स्पटीक ची सुद्धा असू शकते. जप माळ कोणती ही असुद्या त्या संबधी असलेल्या सर्व नियम अवश्य पाळा. नाहीतर आपण जो जप आपले चागले होण्यासाठी करत असतो त्या ऐवजी आपल्या मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही देवदेवीचा क्रोध आपल्यावर होऊ शकतो.

मित्रांनो अनेक वेळा बरेच लोक हे स्वामींची सेवा घरांमध्ये करत असतात आणि जपमाळेने स्वामींचा नाम जप की घरामध्ये करत असतात परंतु अनेक वेळा बाहेरगावी गेल्यामुळे किंवा घरामध्येच जपमाळ तुटल्यावर किंवा जेव्हा हे जप माळेने नामजप करणे शक्य नसते आपल्याजवळ जपमान नसते तेव्हा स्वामींचा नाम जप कसा करावा हा मोठा प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो

तर मित्रांनो यासंबंधीचाच उपाय आज आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या संबंधित उपाय करत असताना जेव्हाही तुमच्याकडे जपमाळ नसेल किंवा जर जपमाळ तुटलेले असेल किंवा तुम्ही परगावी गेला असाल त्या ठिकाणी जपमाळ नसेल तर त्यावेळी काय करावे?

मित्रांनो अशावेळी आपण स्वामी समर्थांच्या मूर्ती समोर किंवा देवघरासमोर बसायचा आहे आणि स्वामींना सर्वात आधी मुजरा आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर लगेचच स्वामींसमोर हात जोडून आपल्याला स्वामींचा नाम जप करायला सुरुवात करायचे आहे.

मित्रांनो ज्यावेळी आपल्याला जपमाळणे स्वामींचा नाम जप करणे शक्य नसेल तेव्हा तुम्ही स्वामींच्या समोर हात जोडून बसा आणि तुम्हाला जितक्या वेळी शक्य होईल तितका वेळ स्वामींसमोर बसून नामजप करायला सुरुवात करा. मित्रांनो जेव्हा तुम्हाला वाटेल की खूप वेळ झालेला आहे आणि तुम्ही जेव्हा काल तेव्हा बंद करू शकता तर मित्रांनो अशा वेळेला जेव्हा तुमच्याकडे जपमाळ नसते तेव्हा तुम्ही स्वामी समर्थ हात जोडूनही स्वामींची नामस्मरण करू शकता.

Leave a Comment