Friday, September 29, 2023
Homeअध्यात्मकर्ज मुक्तीसाठी नक्की करा हा उपाय! अनुभव येईल

कर्ज मुक्तीसाठी नक्की करा हा उपाय! अनुभव येईल

मित्रांनो, तुम्ही गाडीसाठी घरासाठी लग्नासाठी किंवा वैयक्तिक एखाद्या कामासाठी कधी ना कधीतरी कर्ज नक्की घेतला असेल. बर्‍याचदा असं होतं की आपण जे कर्ज घेतलेलं असतं हे कर्ज फिटत नाही. कर्जाचे हप्ते नियमित जात नाहीत, कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि मग निराशा, डिप्रेशन येतं. बरेच जण त्यातून नको त्या गोष्टी करतात आणि मित्रांनो कुटुंब उद्ध्वस्त होतं. आज आपण या कर्जातून मुक्ती कशी मिळवावी यासाठी काही ज्योतिषी उपाय आहेत का याविषयी जाणून घेणार आहोत.

मित्रांनो कर्ज मुक्तीसाठी खरतर तुम्ही स्वतःच प्रयत्न करणे आवश्यक आहे, मात्र बरेच जण असे आहेत जे खूप प्रयत्न करत आहेत मात्र योग्य दिशा सापडत नाही. मित्रांनो अशावेळी आपण हा ज्योतिष उपाय नक्की करा.

हा कर्ज मुक्तीचा उपाय आपल्या कर्ज मुक्ती साठी नक्कीच मदत करेल आणि या उपायाने आपल्याला कर्ज नील करण्यासाठी नक्कीच मदत होईल. मित्रांनो अनेकांनी हा उपाय केलेला आहे. लाखो करोडो रुपयांचा कर्ज, निर्धन झालेले आहेत त्यांनी हा उपाय पूर्ण निष्ठेने करावा लागतो. मित्रांनो यासाठी आपल्याला एक श्रीफळ म्हणजेच नारळ घ्यावा लागेल. मित्रांनो या नारळवरती आपण स्वस्तिक चिन्ह काढायच आहे. मित्रांनो या नारळावरती स्वस्तिक रेखाटण्यासाठी आपण कुंकू वापरायचा आहे.

देशी गायीचे तूप जर उपलब्ध झालं तर मित्रांनो हे देशी गायीचे तूप घ्या नसेल तर कोणत्याही गाईचे तूप चालू शकते. गाईचे थोडं तूप घेऊन त्यात थोडसं कुंकू टाका आणि या कुंकू आणि तुपाच्या मिश्रणाने आपण नारळावरती श्रीफळवरती स्वस्तिक चिन्ह रेखाटायच आहे. मित्रांनो असे स्वस्तिक रेखाटलं नंतर एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा आपण हातात धागा बांधतो असा धागा आपण बाजारातून विकत घ्या किंवा आपण रक्षा सूत्र सुद्धा आणू शकता.

रक्षासूत्र किंवा लाल रंगाचा धागा घ्यायचा हे लक्षात घ्या ज्या व्यक्तीच्या नावे कर्ज आहे, ज्या व्यक्तीचे नावे कर्ज आहे त्याच्या उंचीत हा धागा आपण घ्यायचा आहे. त्याच्या उंची -लांबीचा धागा घ्यायचा. हा लाल धागा या नारळावरती गुंडाळायचा आहे. मित्रांनो गुंडाळताना अगदी व्यवस्थित गुंडाळा आणि त्यानंतर हा नारळी आपल्या देवघरासमोर आपण ठेवायचा आहे. आपण देवा समोर बसायचं आहे आणि मनोमन या नारळास आपण प्रणाम करायचा आहे, वंदन करायचा आहे.

हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायचे आहे की, आम्ही जे कर्ज घेतलं होतं या कर्जातून आमची मुक्तता होऊ दे. आमची कर्ज मुक्ती होऊ दे. कर्जाच्या जंजाळातून आमच्या आणि आमच्या कुटुंबाची मुक्तता होऊ दे. अशी मनोमन प्रार्थना आपण करायची आहे.

मित्रांनो ही प्रार्थना करून झाल्यानंतर आपण जवळपास अशा कोणत्याही जलस्त्रोत यामध्ये म्हणजेच नदी असेल तर असेल विहीर असेल तर शक्यतो जे वाहतं पाणी आहे त्यामध्ये आपण हा नारळ विसर्जित करावा प्रवाहित करावा.

मित्रांनो या दिवशी मोठ्यात मोठी संकट सुद्धा दूर होतात. आपल्या जीवनातून कायमची निघून जातात. हा उपाय करण्याबरोबरच काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. मित्रांनो तुम्ही जर कर्ज घेणार असाल तर लक्षात ठेवा मंगळवारच्या दिवशी चुकूनही कर्ज घेऊ नका. कर्ज, लोन घेण्यासाठी मंगळवारचा दिवस अशुभ असतो.

मंगळवारी घेतलेले लोन कर्ज हे लवकर फिटत नाही. कर्जाचा डोंगर उभा राहतो आणि मग प्रश्न असा आहे की लोन कधी घ्यावं? कोणत्या दिवशी घ्यावे मित्रांनो बुधवारचा दिवस कर्ज घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. बुधवारी घेतलेल्या कर्ज हे लवकर फिटत. ज्यांनी आधीच कर्ज घेतलेला आहे अशा लोकांनी कर्जाचा हाप्ता भरताना तो शक्यतो मंगळवारच्या दिवशी भरावा.

मित्रांनो तसेच प्रत्येक वेळेस सांगतो दररोज देवपूजा करताना अगदी मुठभर मोहरी घ्या. ज्या व्यक्तीच्या नावे कर्ज आहे त्या व्यक्तीने आपल्या हातामध्ये मोहरी हातात घेऊन आपल्या आपल्या घराच्या आतल्या बाजूने, चार भिंतींना लागून ही थोडीशी मोहरी थोडी थोडी करून टाकत जावी.

हे कवच आपल्या घराला एक कवच प्रदान होतं आणि हे कवच आपलं आर्थिक संकटांपासून रक्षण करतात. तर मित्रांनो अशा प्रकारे कर्ज मुक्तीसाठी उपाय नक्की करून पहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची कर्जातून लवकर मुक्त व्हावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना करा.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन