‘या’ जप माळेने मंत्रजाप केल्यास लवकर पूर्ण होते मनोकामना!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

हिंदू धर्मात जप आणि तपश्चर्या ही प्राचीन काळापासून चालत आलेली आध्यात्मिक पद्धती आहे. महान ऋषींनी वर्षानुवर्षे जप आणि तपश्चर्या केल्याचे आपण ऐकतो. नामजपासाठी जपमाळ असणे अत्यंत आवश्यक आहे. ध्यानासाठी मंत्रांच्या जपाच्या बरोबरच जपमाळाचा जप करणे देखील खूप महत्वाचे आहे. बहुतेक जपमाळात 108 मणी असतात. जपाची संख्या मोजण्यासाठी याचा उपयोग होतो.

रूद्राक्षाच्या माळेने केलेला मंत्रजाप विशेष फलदायी मानल्या जाते. यासोबतच जपमाळ जपण्याचे काही नियम वेदांमध्ये सांगण्यात आले आहेत. माळेने जप करताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर व्यक्तीला नामजपाचे फळही मिळत नाही आणि अनेक अशुभ परिणामांना सामोरे जावे लागते. या नियमांचे पालन करणे शुभ आणि फलदायी असल्याचे सांगितले जाते. चला जाणून घेऊया जपमाळ जप करण्याचे नियम काय आहेत

शास्त्रानुसार तुम्ही ज्या जपमाळाने जप करत आहात त्याचे मणी तुटलेले नाहीत ना याची खात्री करा. जपमाळेत तुटलेले मनी असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. जपमाळ तुटली असेल तर ती ठिक करा आणि मणी बदलल्यानंतरच जपमाळाने जप करा.

शास्त्रानुसार जपमाळेत मण्यांची संख्या योग्य असणे देखील खूप महत्वाचे आहे. माळातील मण्यांची संख्या 27, 54 किंवा 108 असू शकते. ब्रह्मांडामध्ये एकूण 27 नक्षत्रे आहेत, ज्याद्वारे हे विश्व चालते. ग्रह नेहमी एका किंवा दुसर्‍या नक्षत्रात असतात, ज्याचा प्रभाव आपल्या जीवनात खूप खोलवर असतो. प्रत्येक नक्षत्रात चार चरण असतात आणि त्यानुसार आपण जपमाळ जपतो.

असं म्हणतात की तुम्ही कोणतीही माळ जपली तरी दोन मण्यांमध्ये गाठ असणं आवश्यक आहे. गाठ नसलेली माला शुभ फल देत नाही. हे अशुभ मानले जाते.

शास्त्रानुसार माळेने जप करताना लक्षात ठेवा की ती झाकलेली असावी तसेच ती कोणाला दिसू नये. याशिवाय नामजपासाठी जपमाळ अनामिकेवर ठेवा आणि अंगठ्याने मणी थांबवून मधल्या बोटाने हलवा.

शास्त्रानुसार हेही ध्यानात ठेवावे की, जपमाळ करण्याची माळ कधीही गळ्यात घालू नये. नामजपाची माळ आणि गळ्यात घालण्याची माळ वेगवेगळी असावी.

Leave a Comment