रोजच्या चहामध्ये फक्त चिमूटभर हे टाका ; सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, अशक्तपणा हाडे मजबूत !

मित्रांनो सध्याची परिस्थिती बदललेली आहे आणि या बदललेल्या परिस्थितीमध्ये प्रत्येकजण घरी बसून काम करत आहे. तासन्तास एका जागेवर बसून अनेक वेळा आपल्या शरीरामध्ये अनेक समस्या सुद्धा निर्माण होऊ लागले आहेत त्यापैकी कंबर दुखी, पाटदुखी, मानदुखी गुडघे दुखी या सगळ्या समस्या आता जोर धरू लागले आहेत आणि जर आपण या समस्यांकडे वेळीच लक्ष दिले तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते.

पण जर तुम्ही या समस्येला दुर्लक्ष केले तर भविष्यात या समस्या मोठ्या आजाराचे कारण ठरू शकतील. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी अशी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत त्या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर करणार आहे.

मित्रांनो बऱ्याच व्यक्तींना पाठदुखीचा, कंबरदुखीचा, गुडघेदुखीचा, सांधेदुखीचा असे अनेक प्रकारचे आजार असतात. यासोबतच हाडे ठिसूळ होणे, हाडे कमकुवत होणे अशा व्यक्तींची हाडे मजबूत करण्यासाठी आपण घरी सहज सोपा आणि त्यासोबतच आपले जी डोकंदुखी आहे किंवा आपल्याला आलेला जो थकवा आहे तो घालवण्यासाठी एकदम अतिशय साधा सोपा उपाय पाहणार आहोत.

तुम्ही दररोज जो चहा घेता त्या चहामध्ये एक चमचा ही पावडर टाकायची आहे. ती पावडर कशी करायची, कधी घ्यायची, कशासोबत घ्यायची हे सर्व आपण पाहुया.

मित्रांनो ही पावडर आहे ती म्हणजे सुंठ पावडर. जे ओले आले असते त्यापासून आपण सुंठ पावडर करत असतो. आल्याचा कंद वाळवला जातो त्याला सुंठ म्हणतात. सुंठ ही कटू, लघु, तीक्ष्ण असली तरी शरीरावर तिचा परिणाम मधुर विपाकामुळे होतो. अशक्त व्यक्तींना किंवा बाळंतपणामध्ये आलेला अशक्तपणा या सर्वांना सुंठीचा शिरा देतात. या शिऱ्यामुळे आम्लपित्त सुद्धा कमी होते.

सुंठ पावडर रात्रभर एरंडेल तेलात भिजवावी. सकाळी हे मिश्रण पिटात टाकून पोळ्या खायला द्याव्यात याने आमवात निश्चित कमी होतो. तसेच याचे जे गुणधर्म आहेत भूक वाढवून अन्नाचे पचन करणे, आमवाताचा नाश करणे, श्वासाचे जे त्रास आहेत, खोकला, हृदयरोग, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास या समस्येवर सुंठ अत्यंत गुणकारी असते. याचा वापर आपण करणार आहे.

दुसरा जो आहे तो म्हणजे जायफळ. तर मित्रांनो काही विशिष्ट पदार्थांमध्ये आपण जायफळाचा वापर करतो. परंतु जायफळाचे आपल्या शरीरास खूप चमत्कारिक असे फायदे होतात. जायफळामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पोट दुखणे, पोटातील घाण बाहेर काढणे, रक्त शुद्धीकरण, तोंडातील किटाणू मारणे, रक्त पुरवठा सुरळीत ठेवणे असे अनेक कार्य जायफळ करत असते. हा एक असा मसाला आहे जो जेवणामध्ये कमी प्रमाणात वापरला जातो पण त्याचे फायदे शरीराला मिळतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात.

तिसरा जो महत्त्वाचा पदार्थ वापरणार आहोत तो आहे लवंग. लवंगाच्या सेवनाने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास, तोंडाची दुर्गंधी जाण्यास मदत होते. यानंतर आपण पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे दालचिनी. पचन विकार, सर्दीसाठी खूप उपयुक्त असते. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे यांचा समावेश असतो.

यानंतर आपण आपण वापरणार आहे ते काळे मिरे. काळ्या मिरीमध्ये पायप्यारीन नावाचा घटक असतो आणि पायप्यारिनमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. या सर्वांचे एकत्रितपणे मिश्रण करायचे आहे आणि यापासून आपल्याला एक मसाला करायचा आहे. सुरवातीला आपल्याला सुंठ घ्यायची आहे. सुंठामध्ये दहा ते पंधरा लवंगा टाकायच्या आहेत. त्याचप्रमाणे काळे मिरे टाकायचे आहे आणि सहा ते सात वेलची पावडर मिक्स करायची आहे आणि दालचिनी मिक्स करायची आहे.

यापासून आपल्याला मसाला बनवायचा आहे की जो आपल्या शरीरासाठी, आपल्या हाडांसाठी एकदम चांगल्या प्रकारे उपयोगी येईल आणि त्यामुळे आपली जी कमकवूत झालेली हाडे आहेत ते पूर्णपणे मजबूत होण्यास मदत होईल. तर हा मिक्स केलेला मसाला मिक्सरच्या साहाय्याने त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. तर तयार झालेली ही पावडर तुम्हाला चहामध्ये चिमूटभर टाकायची आहे.

ज्या ज्या वेळेस तुम्ही चहा पिणार आहात त्या त्या वेळेस चहामध्ये टाकून याचे जर सेवन केले ते तुमची कंबरदुखी, वजन कमी होण्यास अनेक प्रकारचे रोग दूर होण्यास यापासून मदत मिळते. या सर्वच पदार्थांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिनची भरपूर मात्रा असते आणि त्यामुळे तुमची जी हाडे आहेत किंवा तुम्हाला आलेला जो थकवा आहे तो थकवा पूर्णपणे बरा होतो.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment