श्रावण महिन्यात कधीही घराच्या मुख्य दरवाजातून बाहेर फेका हि वस्त; गरिबी घराचा रस्ता विसरून जाईल!

मित्रांनो सध्या पवित्र श्रावण महिना सुरू होणार आहे. या महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे भक्त हजारो किलोमीटर पायी चालत जाऊन भगवान शंकरांचे दर्शन घेत आहेत. तर काहीजण जवळच्या शिवालयात जाऊन सकाळ संध्याकाळ भोलेनाथांची पूजा आराधना करत आहेत. या महिन्यात महादेवांची भक्ती करून त्यांना शीघ्र प्रसन्न करून घेत आहेत.

कारण या महिन्यात भगवान शंकर माता पार्वतीसह पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि मित्रांनो श्रावण महिना हा पुजा आराधना धर्मकर्म, उपाय, साधना करण्याचा महिना मानला जातो. या महिन्यात भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अंतःकरणापासून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला किंवा त्यांना मनोभावे एक तांब्या जल अर्पण केले किंवा फुलं आणि बेलपत्र अर्पण करून देखील भोलेनाथांना प्रसन्न करून घेता येते.

मित्रांनो धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिना हा बारा महिन्यापैकी शुभ महिना मानला जातो. मित्रांनो आज आपण काही उपाय बघणार आहोत तो उपाय श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी करू शकता. श्रावण महिना संपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक बदल बघायला मिळतील. मित्रांनो आजकाल प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त धनप्राप्तीची इच्छा आहे. यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस मेहनत देखील करतो. परंतु त्याला हवं तसं फळ मिळत नाही.

याचं महत्त्वाचे कारण म्हणजे भाग्य. मित्रांनो आपले भाग्य चांगले असेल तर मेहनती शिवाय देखील अनेकजण मालामाल होतात. परंतु भाग्य चांगले नसेल तर मोठ्यात मोठा करोडपती देखील रोडपती बनायला वेळ लागत नाही. हिंदू मान्यतेनुसार ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्या घरात धनांची कधीही कमतरता भासत नाही. त्या घरात धनाची आवक वाढत राहते. माता लक्ष्मी धनाची देवी आहे. मग माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काय करावे की ज्यामुळे माता सदैव आपल्या घरात वास करेल. तसं तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय आहेत.

जस की घर स्वच्छ ठेवणे, माता लक्ष्मीची आराधना करणे, माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करणे आणि असा एक उपाय माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यात केला तर माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होते. यासाठी आपल्या घराच्या मुख्यदारावर एक वस्तु शिंपडायची आहे. सर्वजण मुख्य दारातून ये जा करत असतो, माता लक्ष्मीही याच प्रवेशद्वारातून आपल्या घरात येते. त्यामुळे हे महत्त्वाचे आहे की आपले जे मुख्य द्वार आहे ते जास्तीत जास्त स्वच्छ असावे.

त्या ठिकाणी जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा असावी. त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाही, दरवाज्यातून परत जाते. म्हणूनच घराच्या मुख्य द्वारावर ही वस्तु शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर तिचाही नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरात आली की मातालक्ष्मीही घरात वास करते.

यासाठी कोणता उपाय करायचा आहे ते पाहुया. हा उपाय आपल्याला हळदीच्या पाण्याने करायचा आहे. ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी लवकर उठून स्नान करायचे आहे. देवघरात मातालक्ष्मीची विधिवत पुजा करायची आहे, धुप दीप दाखवायचा आहे. नंतर हळदीचे पाणी बनवायचे आहे. यासाठी एका वाटीत पाणी घेऊन थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे हळदीचे पाणी आपल्या घराच्या मुख्य द्वारावर शिंपडायचे आहे.

त्याचप्रमाणे घराच्या उंबरठ्यावर हळदीच्या पाण्याचा लेप लावायचा आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही. आपल्या आरोग्यासाठी हळद ही उपयुक्त मानली जाते त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सात्विक बनते. ज्या घरात सात्विक, आनंदी वातावरण असते, माता लक्ष्मीचे नामस्मरण केलं जातं त्या घरात मातालक्ष्मी आगमन नक्की करते.

माता लक्ष्मीची कृपा झाल्यानंतर त्या घरात धनाची कधीही कमतरता भासत नाही. आपल्या मेहनतीचे योग्य फळ आपल्याला मिळते. जे कार्य हाती घेऊ त्यात आपल्याला यश मिळते. हा उपाय करायला अगदी सोपा आहे त्यामुळे श्रावण महिना संपण्याआधी कोणत्याही दिवशी हा उपाय नक्की करून पाहा. जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद झाल्यानंतर तुमचं दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment