29 जून देवशयनी आषाढी एकादशीला एक नारळ करेल तुमचे दुःख, अडचणी दूर!

29 जून म्हणजेच गुरुवारच्या देवशयनी आषाढी एकादशी आलेली आहे. ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. आषाढी एकादशीला असे मानले जाते की भगवान विष्णू हे चार महिने निद्रा अवस्थेत जातात. त्यामुळे चार महिने कोणतेही शुभ कामे केली जात नाहीत. कोणतीही शुभ कामे हे देवशयनी आषाढी एकादशी पर्यंतच केली जातात. तर नंतर विष्णू देव हे कार्तिकी एकादशीला निद्रा अवस्थेतून बाहेर येतात आणि मग आपल्याला शुभ कामे केली तरीही चालते.

तर आपल्यापैकी बरेच जण हे आषाढी एकादशीचे व्रत अगदी मनोभावे करीत असतात. कारण सर्व एकादशीमध्ये देवशयनी आषाढी एकादशीला खूपच महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. या दिवशी अनेक प्रकारचे उपाय देखील केले जातात. दानधर्म, अनेक मंत्राचा जप, पूजा विधी या आषाढी एकादशीला केले जातात. तर आज मी तुम्हाला नारळाचा असा एक उपाय सांगणार आहे.

हा उपाय जर तुम्ही देवशयनी आषाढी एकादशी दिवशी केला तरी यामुळे तुमच्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी असतील, संकटे असतील, दुःख असतील हे सर्व काही दूर होणार आहे. तर तुम्हाला हा उपाय देवशयनी आषाढी एकादशी दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी केव्हाही केला तरीही चालतो.

तर तुम्हाला देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी दुकानातून एक नारळ खरेदी करून आणायचा आहे. हा नारळ तुम्ही अजिबात सोलायचा नाही. तर नारळ तो आहे तसाच तुम्ही देवघरांमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे आपली देवपूजा झाल्यानंतर दिवा, अगरबत्ती झाल्यानंतर हा नारळ तुम्ही देवघरांमध्ये ठेवायचा आणि या नारळावरती हळदी कुंकू, अक्षत, फुले वाहून पूजा करायची आहे आणि तुम्हाला तो नारळ दिवसभर आणि रात्रभर देवघरांमध्ये ठेवायचा आहे.

नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तुम्हाला हा नारळ एखाद्या मंदिरामध्ये ठेवून यायचा आहे. म्हणजेच हा नारळ तुम्हाला फोडायचा नाही तर हा नारळ तुम्ही मंदिरामध्ये दान करायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाच्या बुद्ध्याशी ठेवू शकता किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करू शकता. परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही नारळाची देवघरांमध्ये ठेवून पूजा करत असता त्यावेळेस तुम्हाला आपल्या काही ज्या अडचणी असतील, दुःख असतील, संकटे असतील ते सर्व काही बोलायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे.

हे सर्व दुःख, अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना देखील करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकता किंवा मंदिरामध्ये ठेवून येऊ शकता किंवा तुम्ही झाडाचे बुंद्ध्याशी देखील हा नारळ ठेवू शकता.

तर अशा पद्धतीने तुम्ही देवशयनी आषाढी एकादशीला एका नारळाचा जर उपाय तुम्ही केला तर यामुळे तुमचे जे काही दुःख असतील, अडचणी असतील, संकटे असतील हे सर्व काही दूर होणार आहे. तर तुम्ही देखील देवशयनी आषाढी एकादशीला हा उपाय अवश्य करा.

Leave a Comment