Friday, September 22, 2023
Homeअध्यात्म26 जून मोठा सोमवार स्वामींची करा 'ही' विशेष सेवा सर्व टेन्शन होईल...

26 जून मोठा सोमवार स्वामींची करा ‘ही’ विशेष सेवा सर्व टेन्शन होईल कमी!

मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही टेन्शन हे असतेच. म्हणजेच कोणत्या ना कोणत्या विचार हे आपल्या डोक्यामध्ये सतत येत असतात. म्हणजेच काहीना पैशांच्या बाबतीत असतील, तर कोणाला नवीन चालू केलेला उद्योग जर व्यवस्थित चालत नसेल, तसेच कोणाला नोकरीच्या बाबतीत समस्या असतील अशा अनेक समस्या प्रत्येकालाच असतात आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय करत असतो.

परंतु काही वेळेस कितीही उपाय केले किंवा पूजाविधी केले तरी आपले टेन्शन कमी होत नाही. आपल्या समस्या या दूर होत नाहीत व त्यामुळे आपण खूपच निराश होऊन जातो. आपल्यापैकी बरेच जण मठांमध्ये जाऊन स्वामींची सेवा करत असतात. स्वामींचे अनेक काही चमत्कारिकमंत्र जप आहेत कारण या मंत्राच्या जपामुळे आपल्या जीवनातील दुःख हे दूर होत असते.

स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात. तर आज मी तुम्हाला सोमवारची अशीच एक स्वामींची विशेष सेवा सांगणार आहे. तरी या सेवेमध्ये तुम्ही एका मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. म्हणजेच एक माळ तुम्हाला हा जप करायचा आहे.

हा खूपच प्रभावशाली असा मंत्र आहे आणि हा मंत्र तुम्ही संध्याकाळच्या वेळी दिवा अगरबत्ती करता त्यावेळेस करायचा आहे. म्हणजे आपल्या देवघरासमोर बसून स्वामींच्या मूर्ती समोर बसून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे. संध्याकाळी हात पाय स्वच्छ धुवून किंवा अगरबत्ती करून हात जोडून ज्या काही अडचणी असतील, काही विचार येत असतील तर ते सर्व स्वामींना सांगायचे आहे आणि ते दूर व्हावे अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे. तर तो प्रभावशाली मात्र काहीसा असा आहे

ॐ स्मितहास्यानंदाय नमः
तर असा हा मंत्राचा जप तुम्ही 108 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 108 वेळा म्हणजेच एक माळ करायचा आहे. अगदी स्वामींवर विश्वास ठेवून जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहतील. तुमचे सर्व टेन्शन दूर होईल. ज्या काही अडचणी असतील या अडचणी देखील स्वामी महाराज नक्कीच दूर करणार आहेत.

मित्रांनो तुम्ही देखील सोमवारच्या दिवशी संध्याकाळी देवघरासमोर म्हणजे स्वामींच्या मूर्ती समोर बसून या मंत्राचा अवश्य जप करा. तुमच्या जीवनातील सर्व टेन्शन, अडीअडचणी नक्कीच दूर होतील.

RELATED ARTICLES

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

क्राइम

मनोरंजन