करा हा उपाय, नोकरीतील सर्व अडचणी होतील दूर!

मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी या असतातच. म्हणजेच कोणाला पैशासंबंधी, तर कोणाला आरोग्याच्या संदर्भात तसेच कोणाला व्यवसायाच्या संदर्भात, कोणाला आपल्या नोकरी संदर्भात अशा अनेक प्रकारच्या अडचणी या प्रत्येक व्यक्तीला येतच असतात. बऱ्याच वेळा आपण भरपूर शिक्षण घेतो पदवी देखील घेतो तरी देखील आपल्याला नोकरी मिळत नसेल तसेच जर तुम्हाला नोकरी मिळाली तरी त्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला पगार व्यवस्थित भेटत नसेल किंवा नोकरीमध्ये खूपच कामाचा ताणतणाव असेल तर या सर्वांमुळे आपण खूपच त्रासदायी जीवन जगत असतो.

म्हणजेच नोकरीतील अडथळे, अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो. तर आज मी तुम्हाला शास्त्रामध्ये दिला गेलेला असाच एक उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या नोकरी संदर्भातील ज्या काही अडचणी असतील या अडचणी दूर होतात. तसेच मित्रांनो तुम्हाला व्यवसायामध्ये नफा प्राप्त होत नसेल म्हणजेच तुमच्या उद्योगांमध्ये तुमची प्रगती होत नसेल तर तरी देखील तुम्ही हा उपाय केला तरीही चालतो.

एकूणच करिअर संदर्भातच आपला हा उपाय आहे. यामुळे तुमच्या करिअरमध्ये नक्कीच प्रगती झालेली तुम्हाला दिसून येईल. या उपायाचा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. तर हा उपाय तुम्हाला सलग 43 दिवस करायचा आहे. मित्रांनो दररोज न चुकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर आपल्या कुंडलीतील सूर्यग्रह हा कमकूवत होत असेल तर त्यावेळेस आपल्या नोकरीमध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात.

त्यामुळेच आपण या उपायांमध्ये सूर्याची उपासना करायची आहे. तर यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे आहे. म्हणजेच जल अर्पण करायचे आहे. तर हे जल अर्पण करत असताना तुम्ही एखाद्या तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एखाद्या लाल फुल टाकायचे आहे. तर तुम्हाला लाल फुल मिळत नसेल तर तुम्ही लाल चंदन किंवा लाल कुंकू त्यामध्ये टाकायचा आहे आणि तुम्ही हे पाणी सूर्याला अर्पण करायचे आहे.

हे पाणी अर्पण करत असताना तुम्ही सूर्य देवाचा मंत्र जप करायचा आहे. ओम सूर्य देवाय नमः किंवा तुम्ही गायत्री मंत्राचा जप देखील केला तरीही चालतो. तर असे हे तुम्ही सलग 43 दिवस करायचे आहे. अगदी मनोभावेने श्रद्धेने तुम्ही हा उपाय करायचा आहे. परंतु मित्रांनो हा उपाय करत असताना तुम्ही ज्या वेळेस म्हणजेच पहिल्या दिवशी ज्या वेळेस सूर्याला जल अर्पण करता त्याच वेळेला तुम्ही दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे सलग 43 दिवस त्याच वेळेला सूर्याला जल अर्पण करायचे आहे.

म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जर तुम्ही आठ वाजता सूर्याला जल अर्पण केले तर दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला आठ वाजता सूर्याला जल अर्पण करायचे आहे. परंतु बारा वाजण्याच्या आत मध्येच तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचे आहे आणि एक निश्चित वेळ ठरवूनच तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचे आहे. हा उपाय जर तुम्ही सलग 43 दिवस केला तर तुमच्या सर्व नोकरी संबंधित ज्या काही अडीअडचणी असतील त्या सर्व नक्कीच दूर होतील.

करियर संबंधी तसेच उद्योग तुमचा जर भरभराटीकडे, प्रगतीच्या दिशेने चालत नसेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला प्रगती झालेली नक्कीच दिसून येईल. तर असा हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तुमच्या सर्व नोकरी संबंधित अडचणी दूर झालेल्या जाणवतील.

Leave a Comment