गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर फक्त रोज या चार ओळी बोला, पारायण केल्याचे फळ मिळेल!

मित्रांनो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य प्रत्येक भक्तांच्या मनी आहे. म्हणजेच काय की प्रत्येक संकटातून स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात आपला बाहेर काढतील असा विश्वास हा प्रत्येक भक्ताला असतोच. तर स्वामींचे भक्त सेवेकरी अगदी मनापासून स्वामींची सेवा करीत राहतात. ते मठांमध्ये जातात प्रत्येक अडचणीवर स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा सांगितले गेलेले आहेत आणि त्या अगदी मनोभावे प्रत्येक सेवेकरी फक्त पूर्ण करीत असतातच.

 

स्वामी महाराजांचे भक्त एकदातरी गुरुचरित्राचे पारायण करतात. तर काही जण एक पेक्षा जास्त वेळ करतात. तर काहींना वेळे अभावी किंवा काही इतर करणा मुळे जमत नाही. पण त्या व्यक्तींच्या मानत एक इच्छा असते. की आपण पण स्वामींचे गुरुचरित्राचे पारायण करावे. पण त्यात बऱ्याच गोष्टी असतात त्या नचुकता कराव्या लागतात. त्या काही व्यक्तींना काही गोष्टी जमत नसतात त्यामुळे त्यांचे पारायण पूर्ण होत नाही. आणि मित्रांनो या साठी आपण सोपा उपाय आपण पाहणार आहोत.

 

मित्रांनो जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण तुम्हाला जर करायला जमत नसेल तर तुम्ही रोज या ओळी बोला. गुरुचरित्र पारायण केल्याचे लाभ तुम्हाला होतील. मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की, स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये एक मुख्य सेवा असते ती म्हणजे पारायण करणे आणि मित्रांनो बरेच लोक वर्षभरात एक दोन पारायण करत असतात एक म्हणजे दत्तजयंती निमित्त पारायण करत असतात किंवा नवरात्रीमध्ये पारायण करत असतात. हे पारायण असते श्री गुरुचरित्र पारायण 7 दिवसाचे पारायण असतात. आणि मित्रांनो याचे काही नियम असतात. एक भाजी किंवा एक कोणतातरी पदार्थ आपल्याला खावा लागतो. हे पारायण भरपूर लोकांना शक्य नसतं. कारण खाली झोपावे लागते. बेडवर, पलंगावर, खाटेवर झोपू शकत नाही.

 

आणि मित्रांनो आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की, गुरुचरित्राचे पारायण केल्याने आपले पण शांत होते. व मनात असलेल्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. स्वामींचा आशीर्वाद आपल्यावर राहतो, स्वामींची कृपा दृष्टी आपल्याव चागली राहते. आणि आपण जी स्वामींची सेवा करतो त्याचा लाभ हि मिळतो. त्याच बरोबर गुरुचरित्राचे पारायण करताना त्याचे नियम पाळावे लागतात. अन्यथा परायणाचे लाभ आपल्याला मिळत नाही. परायणाचे नियम खुप कडक असतात.

 

आणि म्हणुनच मित्रांनो बऱ्याच लोकांना हे पारायण जमत नाही. धावपळीच्या जीवनात नोकरीसाठी धावपळ करावी लागते, काम धंद्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे बऱ्याच लोकांना पारायण करणे शक्य नसते. तर अशा वेळेस काय करावे? तर मित्रांनो ज्या लोकांना 52 अध्याय हे मोठे गुरुचरित्र वाचन जमत नाही किंवा हे पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने विश्वासाने आणि मनोभावाने बोलावा.

 

मित्रांनो रोज सकाळी उठल्यानंतर पूजा करताना किंवा ऑफिसच्या बाहेर जाताना देवतांसमोर किंवा स्वामींसमोर हात जोडून हा 4 ओळींचा श्लोक अवश्य बोलवा. हा श्लोक काही असा आहे,

“दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपादपीठापुरी

त्यामागे दुसरा नृसिंहसरस्वती कारंजग्रामांतरीं

तीर्थे हिंडत पातला भिल्लवर्तचिये संगमा

तेथुनि मठ गाणगापुरि वसे वारी दीनांच्या श्रमा”

तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक सोपा सरळ श्लोक आहे. हा तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा आणि रोज सकाळी बोला. मित्रांनो जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही फक्त हा एक श्लोक दररोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या प्रतिमेसमोर किंवा फोटो समोर बसून अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने जर याचे वाचन आणि चिंतन केले त्यामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याने जे लाभ होतात इच्छा पूर्ण होतात.आणि अनुभव येतात ते सगळे लाभ तुम्हाला या श्लोक बोलल्याने होणार आहे. हा एक श्लोकी गुरुचरित्र आहे. एक श्लोक आहे अवश्य बोला अनुभव नक्की येतील.

Leave a Comment