स्वामी सेवा करत असताना स्वामी भरपूर परीक्षा घेतील त्यावेळी नक्की करा हे काम!

मित्रांनो, प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी असावी, आपले जीवन कायम आनंदी असावी, कोणत्याही प्रकारच्या अडचणी असू नयेत तसेच घरामध्ये सर्वजण आनंदी राहावेत असे वाटतच असते आणि त्यासाठी मग आपण शास्त्रामध्ये दिले गेलेले उपाय देखील करत असतो. परंतु काही वेळेस या उपायांचा आपल्याला काही फायदा होत नाही. म्हणजेच काही ना काही अडीअडचणी या सतत येतच राहतात.

तसेच आपण देवी देवतांचे अनेक व्रत उपवास करीत असतो तसेच तुमच्या अर्चना करीत असतो. परंतु आपल्या मनातील इच्छा या पूर्ण होत नाहीत. तसेच अडचणी या कमी होत नाहीत. तर आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींची सेवा देखील करीत असतात. जेणेकरून आपल्या जीवनातील अडीअडचणी कमी व्हाव्यात. तर स्वामींची सेवा करीत असताना स्वामी हे भक्तांच्या परीक्षा घेत असतात. म्हणजेच तो फक्त मनापासून आणि श्रद्धेने ती सेवा करत आहे का हे स्वामी परीक्षा घेऊन पाहत असतात. परंतु आज मी तुम्हाला असे एक काम सांगणार आहे हे काम तुम्ही त्यावेळी अवश्य करायचे आहे. म्हणजेच आपण स्वामींची सेवा करत असताना हे काम अवश्य करणे गरजेचे आहे.

मित्रांनो दररोज सकाळी लवकर उठून आपल्या देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची ही विशेष सेवा करत असतात आणि या सेवेमध्ये स्वामी समर्थांच्या विशेष मंत्राचा जप त्याचबरोबर स्वामी नावाचा जप स्वामींच्या गायत्री मंत्राचा त्याचप्रमाणे तारक मंत्राचा जप करत असतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ यांच्या गुरुचरित्र पारायण मधील अध्याय ही स्वामी सेवेकरी दररोज अगदी मनापासून वाचत असतात.

मित्रांनो हे स्वामीभक्त आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वामी सेवा करत असतात आणि स्वामींवर अगदी मनापासून श्रद्धा ठेवत असतात. परंतु मित्रांनो स्वामीजी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात.

मित्रांनो जेवढे आपण स्वामींची पूजा,अर्चा करत असतो त्याचबरोबर ज्या वेळी आपण स्वामींची सेवा करत असतो त्यावेळी आपल्या सेवेमध्ये अनेक अडचणी येत असल्याचे आपल्याला दिसून येते. मित्रांनो आपण सेवा करत असताना अशा अडचणी आपल्या सेवेमध्ये येत असतात. या वेळी त्या अडचणी म्हणजेच स्वामी आपली परीक्षा देत असतात.

म्हणूनच मित्रांनो आज आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत की ज्यावेळी आपण स्वामी सेवा करत असतो त्यावेळी आपल्या सेवेमध्ये अनेक अडचणी, अडथळे, समस्या निर्माण होत असतात आणि त्या म्हणजेच स्वामी आपली परीक्षा घेत असतात. त्यावेळी आपण नेमके काय करावे याबद्दलचा आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

परंतु मित्रांनो आपल्यातील बरेच स्वामीभक्त ज्यावेळी अशा अडचणी, समस्या निर्माण होतात. त्यावेळी स्वामी सेवा मध्येच सोडून देतात. परंतु मित्रांनो हे अत्यंत चुकीचं आहे कारण मित्रांनो कितीही मोठी समस्या किंवा अडचण आपल्या स्वामी सेवेमध्ये येत असेल तर त्यावेळी तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा की त्या समस्या पेक्षा आपले स्वामी मोठे आहेत. स्वामीं पुढे ही समस्या काहीच नाही. म्हणूनच त्या वेळी स्वामींच विचार आपल्याला केला पाहिजे आणि स्वामींची ही सेवा आपल्याला पूर्ण केली पाहिजे.

कारण मित्रांनो ज्यावेळी आपल्या भक्तावर एखादे संकट किंवा अडचणी येते त्यावेळी स्वामी ते पाहत असतात आणि म्हणूनच त्या वेळी स्वामी आपल्या भक्ताला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा कोणता ना कोणता मार्ग काढतातच आणि आपल्या भक्ताची मदत करत असतात.

म्हणूनच मित्रान्नो जेव्हा आपण एखादी स्वामी सेवा किंवा स्वामींची पूजा-अर्चा करत असतो त्यावेळी जर त्यामध्ये काही समस्या किंवा अडचणी आल्या तर त्यावेळी डगमगून न जाता आणि सेवां मध्ये न सोडता आपल्याला त्यावेळी स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे आणि स्वामींना आठवून पुन्हा एकदा त्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपली स्वामी सेवा पूर्ण केली पाहिजे.

त्याच बरोबर मित्रांनो आणखीन एक गोष्ट स्वामी सेवा करताना अत्यंत महत्त्वाचे आहे ती म्हणजे मी खूप दिवसापासून स्वामी सेवा आणि स्वामींची भक्ती करत आहे तरीही मला त्याचे फळ मिळाले नाही, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाले नाही, असे वाईट विचार आपल्याला आपल्या मनामध्ये आणायचे नाही. कारण स्वामी हे सगळ्या भक्तांवर समान प्रेम करत असतात.

त्याचबरोबर स्वामी आपला प्रत्येक भक्ताची काळजी घेत असतात.म्हणूनच आपण फक्त विश्र्वास ठेवले पाहिजे आणि आपण आपली स्वामी सेवा पूर्ण करून स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजे. स्वामी आपल्याला आपल्या सेवेचे फळ नक्की देतीलच.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment