नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,
मित्रांनो 23 मार्च रोजीश्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे महाराजांचा प्रकट दिन म्हणजे ज्या दिवशी स्वामी महाराज धरतीवर प्रकट झाले. हा दिवस सर्व स्वामी भक्तांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.
स्वामी समर्थ महाराजांचे प्रकट दिन, या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेणेकरून आपल्या घरातील सुख समाधान टिकून राहणार आहे घरातील दारिद्र्य बाहेर जाऊन या घराला सुख समाधान लागणार आहे त्यासाठी पाहूया या दिवशी करावयाचा खास उपाय खालील प्रमाणे आहे.
मित्रांनो, 23 मार्च रोजी सर्वप्रथम आपण आंघोळ वगैरे करून आपल्या देवघरातील देव पूजा वगैरे आवरून सर्वप्रथम स्वामींना नमस्कार करून मनोभावे त्यांची पुजा करून त्यांचे नामस्मरण करून आपल्या देवघरामध्ये आपल्याला ही
एक वस्तू आणायची आहे, मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला स्वामींचा प्रकट येण्याआधी आपल्याला ही गोष्ट आपल्या घरांमध्ये आणायची आहे.
मित्रांनो स्वामींचा प्रकट दिन येण्याआधी आपल्याला घरामध्ये जी वस्तू आणायची आहे ती म्हणजे स्वामींची मूर्ती मित्रांनो जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल तर मित्रांनो स्वामींचा प्रकट दिन येण्याआधी तुम्हाला आपल्या घरामध्ये स्वामींची एखादी मूर्ती जरूर आणली पाहिजे आणि मित्रांनो जर तुम्हाला स्वामींची मूर्ती आपल्या घरामध्ये आम्ही शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही स्वामींचे प्रतिमा किंवा स्वामींचा फोटो तुमच्या घरामध्ये आणू शकता.
परंतु स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्या घरामध्ये आल्या नंतर त्याची तुम्हाला विधिवत गणेश पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे. आणि त्यानंतर 23 मार्च रोजी ज्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे त्या दिवशी तुम्हाला त्या मूर्ती ची विशेष पूजा देखील करायची आहे. मित्रांनो अशा पद्धतीचा हा सोपा उपाय तुम्ही स्वामींचा प्रकट दिन येण्यापूर्वी नक्की करा.
आपण जर स्वामींच्या प्रकट दिना आधी किंवा दिवशी उपाय केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही घरात सुख समाधान समृद्धी धनसंपदा यांची वाढ होणार आहे. जर आपण श्रद्धेने पासून स्वामींना आपली अडचण सांगितली तर स्वामी महाराज दूर करणार आहेत त्यामुळे ह्या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे.
मित्रांनो या उपायांमुळे आपले नशीब उजळेल.आपण करणाऱ्या सर्व कामांना मोठे यश प्राप्त होईल. धंद्यामध्ये बरकत, नोकरीमध्ये बढती. अविवाहितांचे विवाह जुळतील. अशा अनेक विविध घटना आपल्या घरातील चांगल्या घडतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.