नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आरोग्यसेवा सर्व प्रकारच्या आजारावर स्वामींनी सांगितलेली ही आरोग्यसेवा आहे. जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींची सेवा करतात आणि तुम्हाला हवी असेल, आरोग्यसेवा पाहिजे की, आरोग्यसेवा आम्ही रोज करू शकतो. जेणे करून आमचे स्वस्त, आमच्या आरोग्यसेवा चांगले राहिल. तर मित्रांनो ही सेवा नक्की करावी आणि मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात की कशा पद्धतीने आपल्यालाही स्वामी समर्थांची सेवा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये असणारे आजारपण दूर करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात स्वामींची सेवा करतात. आणि तुम्हालाही हवी असेल की आरोग्य सेवा पाहिजे ही आरोग्य सेवा मी रोज करू शकतो. जेणेकरून आमचे स्वास्थ आमच्या आरोग्य चांगले राहील. तर मित्रांनो ही सेवा नक्की करावी आणि मित्रांनो या सेवेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः ओम दाताय नमः ओम नमः शिवाय ओम मच्छिंद्रनाथाय नमः हा संपूर्ण एक मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्हाला तीन माळ करायचा आहे. या झाल्यानंतर तुम्हाला तीन माळ “ओम राम रीम रक्ष रक्ष शिव गोरक्ष” या मंत्राचा जप सुद्धा तीन माळी करायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर तीन वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर एक वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टक बोलायचे आहे. आणि त्यानंतर एक वेळेस मारुती स्तोत्र बोलायचं आहे. त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रामधील चौदावा अध्याय एक वेळेस वाचायचा आहे आणि तरी खूप मोठी सेवा आहे. परंतु तुम्हाला जर एवढं सगळं करायचे जमत नसेल तर तुम्ही जे 11 वेळेस आहे तीन वेळेस आहे तीन माळी आहे ते तुम्ही एक एक वेळेस करू शकतात. मित्रांनो ज्या मंत्राच्या तीन माळी सांगितल्या आहेत तिथे एक माळ करू शकतात. जो मंत्र अकरा वेळेस सांगितलेला आहे तो एक वेळेस करू शकता.
आणि मित्रांनो इतर कोणतीही अगरबत्ती या सेवेमध्ये वापरायची नाही. फक्त आयुर्वेदिक केमिकल नसलेली अगरबत्ती तुम्हाला घ्यायचे आहे. आणि ती अगरबत्ती लावूनच तुम्हाला ही सेवा करायचे आहे. त्यासोबत तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक तुळशीचे पानं टाकून त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवून सेवा करायची आहे. म्हणजे एका तांब्यात पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये तुळशीचे पान टाकायचं अन् त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवायचा. म्हणजे तो डाव्या बाजूलाच तांब्या ठेवायचा आणि हात ठेवून मग आपण उजव्या हाताने माळी करू शकतो किंवा जे वाचन आहे जे मंत्र जप आहे, जे स्तोत्र आहे, जे पारायण आहे ते आपण करू शकतो.
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो ही सेवा पूर्ण झाल्यावर जी आयुर्वेदिक अगरबत्ती आपण लावलेली आहे. जिच्यामध्ये केमिकल नाही त्याची जी पडलेली रक्षा असेल ती सगळ्यात आधी कपाळाला लावावी. आणि त्यानंतर गळ्याला लावावी आणि थोडी रक्षा जिभेने चाटून घ्यावी. आणि उरलेली रक्षा थोडीफार चिमूटभर तांब्यामध्ये टाकून ती आपण पाण्यामध्ये पिऊन घ्यावी. तसेच जे तुळशीचे पान आपण टाकलेल आहे तेसुद्धा चाऊन आपण खायचं आहे. तांब्यातील तीर्थ शल्लक ठेवू नका. सगळं पाणी तुम्हाला प्यायचे आहे. आणि मित्रांनो ही सेवा सकाळ संध्याकाळ करायची असते पण तुम्हाला दिवसातून एक वेळेस जमली तरी चालेल.
मित्रांनो ही सेवा एकाच व्यक्तीसाठी असून याच्यातील तीर्थ दुसरे कोणीही घेऊ नये आणि सेवा सलग 21 दिवस करावी. मित्रांनो ही सेवा करत असताना आपण पोटभर जेवण करावे आणि कुठलेही मनात वाईट विचार आणू नये आणि मित्रांनो मनापासुन श्रद्धेने ही सेवा करावी. जो व्यक्ती ही सेवा करत आहे त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ होईल. जर भरपूर व्यक्ती असतील त्यांना ही सेवा करायचे आहे, त्यांना लाभ हवे असेल तर त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे. जो व्यक्ती तांब्यावर हात ठेवून ही सेवा करेल त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ मिळेल आणि त्याच व्यक्तीने ते तीर्थ सुद्धा प्यायचं आहे.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.