नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल आणि घरामध्ये सुख समृद्धी यावी असे वाटत असेल तर मित्रांनो घटस्थापना म्हणजेच नवरात्री घेण्याआधी घरात आणा ही 1 वस्तू घरात श्रीमंत येईल, सुख समृद्धी नांदेल, लक्ष्मीचा वास होईल. मित्रांनो नवरात्री यावर्षी नवरात्री 26 सप्टेंबर सोमवार पासून सुरू होणार आहे. म्हणजेच 26 सप्टेंबर नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना आहे. या दिवशी घटाची स्थापना केली जाईल. परंतु मित्रांनो नवरात्री येण्याआधी म्हणजे 26 तारखेच्या आधीच किंवा 26 तारखेलाही तुम्ही ही वस्तू आणू शकता आणि मित्रांनो सध्या बरेच लोक विचार करतात की, पितृपक्ष सुरू आहे म्हणून आम्ही नवीन काही खरेदी करणार नाही, नवीन कोणती वस्तू आणणार नाही.
तर पितृपक्षात तुम्हाला आणायचं नसेल तर तुम्ही 26 तारखेला दिवसा ही वस्तू आणू शकता. परंतु 26 तारखेलाच आणा. कारण नवरात्रात त्याच दिवसांपासून सुरू होणार आहे आणि म्हणून तुम्ही नवरात्रीच्या आधी आणायची असेल तर आधी आणा किंवा 26 तारखेला पहिल्यादिवशी आणायची असेल तर पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही ही वस्तू आणू शकता. आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला नवरात्री येण्याआधी किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुमच्या घरात तुमच्या कुलदेवतेची मूर्ती आणायचे आहे. मित्रांनो कुलदेवतेची मूर्ती आता तुमच्या घरात कुलदेवतेची मूर्ती आधीपासूनच असेल, तर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी त्या कुलदेवतेची मूर्तीची अभिषेक करायचे आहे.
मित्रांनो दुधाने, पाण्याने त्यांचे पूजन करायचे आणि 9 दिवसापर्यंत त्यांना विविध प्रकारचे नैवेद्य तुम्ही दाखवायचे आहे. आणि त्यांची पुजा करायचे त्यांच्या मंत्राचा जप करायचा. त्याची आरती करायची असं 9 दिवसापर्यंत तुमच्या कुलदेवीची किंवा कुलदेवतेची तुम्ही आराधना सेवा करावी. परंतु आता प्रश्न पडतो की आमच्याकडे कुलदेवीची मूर्ती नाही. तर मग कुलदेवीची मूर्ती नसेल तर कुलदेवी तुम्हाला माहीत असेल की, आमची कुलदेवी ही आहे. तर नवरात्रीच्या दिवशी किंवा पहिल्यादिवशी किंवा नवरात्री येण्याआधीच तुम्ही ती मूर्ती घरात घेऊन यायची आहे.
आणि आपल्या देवघरात तिची स्थापना करायची आहे.
परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना आता असा प्रश्न पडतो की, बऱ्याच लोकांना तर आमची कुलदेवी कोण आहे हेच माहित नसतं. तर मग अशा वेळेस तुम्ही कुलदेवीच्या नावाने 1 कळस देवघरात स्थापन करावा 9 दिवसांसाठी. पहिल्या दिवशी तुम्ही स्थापन करावा. म्हणजे तांब्या घ्यायचा त्यामध्ये विड्याचे किंवा आंब्याचे पाने लावायची शुद्ध पाणी भरायचं आणि त्यावर नारळ ठेवायचा त्याचे पूजन करायचे. मग तुमची कुलदेवी कोणती असू द्या. फक्त स्मरण करायचं कुलदेवीचे स्मरण करायचे. नाव माहीत नसेल कुलदेवी माहित असेल तरी तुम्ही स्मरण करायचे.
कुलदेवीला नमस्कार करायचे आणि त्या कळसाचे कुलदेवी समजून 9 दिवसापर्यंत पूजन करायचे आणि नऊ दिवस झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ते नारळ फोडून खायचे नाही. त्यातील सर्व पाणी असेल, त्याच्यातील पान असतील ते सर्व तुम्ही विसर्जन करायचं आहे. कळसातील पाणी असेल तर तुम्ही तुळशीमध्ये विसर्जन करू शकता. आंब्याचे, विड्याचे पाने असतील, नारळ असेल तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे. तर अशा रीतीने तुम्ही नवरात्री येण्याआधीच किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक तर कुलदेवीची मूर्ती आणा किंवा असा कळस स्थापन करा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.