श्रावण महिन्यात महादेवाच्या नावाने भरा एक कलश, पैसा सुख सर्व काही मिळेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

काही दिवसातच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. श्रावण महिना 28 जुलै रोजी सुरू होणार आहे आणि मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि आपल्यातील अनेक भोले बाबांचे भक्त या महिन्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या महिन्यांमध्ये भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रतवैकल्ये, उपवास केले जातात. भोलेनाथ हे आपल्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि त्यांना इच्छित वर प्रदान करतात. एकीकडे चांगले कार्य करून आपण भोलेनाथांना प्रसन्न करू शकतो.

आणि मित्रांनो 1 ऑगस्टला सोमवार आहे आणि श्रावण महिन्याचा पहिला सोमवार येत आहे. 28 जुलैला दीप अमावस्या असल्यामुळे 1 ऑगस्ट रोजी श्रावण सोमवाराला सुरुवात होत आहे. मित्रांनो आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय जर मित्रांनो आपण श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या दिवशी केला

तरी यामुळे भगवान भोलेनाथ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्याचबरोबर आपल्यावर येणारे प्रत्येक संकटातून आपली सुटका करतील तर मित्रांनो हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊयात मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला भगवान शंकरांच्या नावाने एक कलश तयार करून आपल्या देवपूजेमध्ये प्रस्थापित करायचा आहे.

तर आपल्याला हा कलश श्रावण सोमवारच्या दिवशीच भरायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये कुलदेवताच्या नावाचा एखादा कलश असेल तर तो कलश सोडून तुम्हाला आणखी एक कलश महादेवाच्या नावाचा भरायचा आहे. कलश करण्यासाठी तुम्हाला पुढील प्रकारचे साहित्य लागते, मित्रांनो हा कलश तयार करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या, नारळ, आंब्याचे पान, एक सुपारी आणि एक नाणे बस एवढेच साहित्य तुम्हाला कलश भरण्यासाठी लागते. यासाठी तुम्हाला आधी कलश स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. त्यावरती स्वस्तिक काढायचे आहे, नंतर त्या कलशामध्ये शुद्ध पाणी भरून त्यामध्ये सुपारी हळद व पैसा टाकायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला त्या कलशावर ती विड्याचे किंवा आंब्याचे पाने लावायची आहे आणि त्या पानांवर तुम्हाला न सोललेले नारळ ठेवायचे आहे. त्यानंतर तो कलश तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कुठेही ठेवायचा आहे. जेथे तुमच्यासाठी सोयीस्कर जागा असेल तेथे तो कलश तुम्ही ठेवू शकता.

कलश ठेवल्या नंतर त्या कलशाची ओवाळणी करायची आहे आणि त्यानंतर कलशाला अष्टगंध व हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची. आणि त्यानंतर देवाला प्रार्थना करायची की, हे महादेवा आमच्या घरा वरील सर्व संकटे बाधा दुर कर. आमच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नको, आमचे सर्व चांगले करा. आमच्यावर सुख समृद्धी नांदू दे. पैसा टिकू दे व यशाची प्राप्ती आम्हाला होऊ दे.

आमचे आरोग्य चांगले राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला त्या कलशासमोर करायची आहे. आणि त्यानंतर पुर्ण ३० दिवस तो कलश तुम्हाला जेथे ठेवलेला आहे तेथेच राहू द्यायचा आहे. फक्त एक दिवस त्याचे नीट पूजन करावे आणि ३० दिवसानंतर जेव्हा श्रावण महिना संपणार तेव्हा ते नारळ आणि आपण आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहे. त्या कलशामध्ये टाकलेली सुपारी आणि पैसा आपल्याला आपल्या तिजोरीत किंवा दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवायचा आहे. आणि उरलेले तांब्यातील पाणी आपण थोडेसे घरात शिंपडावे व बाकीचे पाणी आपल्या घरातील तुळशीला टाकून द्यावे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *