नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो 24 जुलै रविवारच्या दिवशी कामिका एकादशी अली आहे. वर्षभरात ज्या एकादशी येतात त्यात कामिका एकादशी अत्यंत महत्वाची आणि माता लक्ष्मींना प्रसन्न करणारी एकादशी मानली जाते. तसे तर भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. जर तुमच्या जीवनात पैस्याच्या संबंधित काही समस्या असतील किंवा तुमच्या कुटुंबात घरात अडचणी असतील. तुमच्या डोक्यावर घर कर्ज असेल तर 24 जुलै रविवार रोजी येणाऱ्या एकादशीस काही उपाय आपण अवश्य करा.
मित्रांनो आज आपण आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक छोटासा उपाय पाहणार आहोत मित्रांनो हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा आहे आणि मित्रांनो 24 जुलै रविवार कामिका एकादशीच्या दिवशी आपण रात्री झोपण्यापूर्वी आपण ह्या एका मंत्राचा जप आपण अवश्य करा. हिंदुधर्म शास्त्रात अशी मान्यता आहे कि हि कामदा एकादशी जी आहे ती भक्तांच्या दुःखाचे निवारण करते. ह्या दिवशी जो कोणी व्यक्ती मनोभावे पूजा करतो त्यांना सर्व दुःखातून मुक्ती मिळते. सोबतच त्याचे भाग्य सुद्धा तेज बनते.
ज्योतिष शास्त्रानुसार जी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने हे उपाय करते त्यांना धनप्राप्ती तर होतेच तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती देखील होते. मित्रांनो पहिला उपाय आहे तो कर्जमुक्तीसाठी, तुमच्या डोक्यवरील कर्ज फेडण्यासाठी ह्या कामिका एकादशीस सायंकाळी तांब्याभर जल पिंपळास अवश्य अर्पण करा. घरात तांब्याचा तांब्या असतो त्यात पाणी घेऊन ते जल आपण सायंकाळी अर्पण करावे तसेच आपण त्यापूर्वी एक गाईच्या तुपाचा दिवा आपण तिथे लावायचा आहे.
मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कि पिंपळाच्या झाडात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो कामिका एकादशीस जल अर्पण केल्याने तसेच तिथे दिवा लावल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि कर्जातून मुक्ती होते. हे जल अर्पण करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे. तसेच आपण ११ वेळा ह्या झाडाला ह्या मंत्राचे उच्चारण करत प्रदिक्षणा घालायच्या आहेत. नंतर आपण प्रार्थना करायची आहे कि आपल्या जीवनातून कर्जमुक्ती व्हावी आपल्या जीवनातून सर्व पैस्याच्या अडचणी दूर होण्याची प्रार्थना करायची आहे.
मित्रांनो ह्या उपायाने कर्जमुक्ती तर होतेच शिवाय आपल्याला जर नोकरीसंबंधी काही अडचणी येत असतील तर त्याही ह्या उपायाने दूर होतात. तसेच ज्यांना अपार धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. विष्णूंना दक्षीणावरील शंखाने त्यात गंगाजल घेऊन अभिषेख घालायचा आहे. ह्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते. मित्रांनो अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी जे लोक मनोभावे श्री सूक्ताचा पाठ करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.