नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार तुळशीमध्ये देवाचा वास असतो. या कारणास्तव, प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावले जाते, जेणेकरून घरात नेहमी सुख आणि शांती राहावी. तुळशीच्या रोपाची नियमित पूजा करावी हे आपल्या पूर्वजांपासून सांगण्यात आलंय. त्यामुळे तुळशीची पूजा नित्यनेमाने केली जाते.
वास्तुशास्त्रानुसार रोज सूर्योदयापूर्वी जल अर्पण करणे आणि संध्याकाळी तुळशीखाली तुपाचा दिवा लावल्याने सर्व त्रास दूर होतात. यासोबतच घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्याची दिवसातून दुप्पट प्रगती होते. त्यामुळे तुळशीची पूजा करणं नेहमी शभ मानल जातं.
आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्रात तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत काही नियम आहेत. या नियमनुसारच तुळशीला जल अर्पण करायचे असते. मित्रांनो एकादशीला तुळशीला पाणी अर्पण करू नये असं म्हणतात, कारण या दिवशी माता तुळशी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते.
अशा स्थितीत जल अर्पण करून त्यांचे व्रत मोडले जाते. त्यामुळे ती रागावते आणि त्या व्यक्तीला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आणि त्याचबरोबर मित्रांनो शास्त्रानुसार स्नान न करता तुळशीला स्पर्श करणे पाप मानले जाते. त्यामुळे नेहमी आंघोळीनंतरच तुळशीला पाणी अर्पण करावे.
तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये आणि मित्रांनो रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये आणि त्याचबरोबर या दिवशी तुळशीमातेचा विसावा असतो आणि मित्रांनो तुळशीमध्ये जास्त पाणी टाकू नये. तसेच सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी देणे शुभ मानले जाते. मित्रांनो तुळशीचे रोप नेहमी पूर्व दिशेला लावावे असे वास्तूतज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय तुळशीचे रोप ईशान्य दिशेला लावता येते. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा आणि शुभ फल देते. मात्र तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवू नका.
आणि त्याचबरोबर आपल्या ज्योतिष शास्त्रानुसार तुळशीच्या रोपाला जल अर्पण करताना या विशेष मंत्राचा उच्चार केल्यास सकारात्मक उर्जा हजार पटीने वाढते. एवढेच नाही तर या मंत्राचा जप केल्याने रोग, दु:ख, रोग इत्यादीपासून मुक्ती मिळते. चला तर मग जाणून घ्या कोणता आहे तो मंत्र ज्याचं जप आपल्याला तुळशी मातेला अर्पण करत असताना करायचा आहे तो, तर मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,
“महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी
आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते”
मित्रांनो दररोज आपल्या घरामधील स्त्रिया ज्यावेळी तुळशी मातेचा पूजा करत असतात आणि तुळशी मातीला जल अर्पण करत असतात त्यावेळी मित्रांनो व सांगितलेल्या मंत्राचा जप जर आपण अकरा वेळा तुम्ही 21 वेळा केला तरी यामुळे आपल्या घरामध्ये सुसमृद्धी नांदेड आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.