10 जुलै आषाढी एकादशी फक्त १ केळ गुपचूप ठेवा ‘इथे’ धनलाभ होईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकदाशी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशी. ह्या आषाढीचे महत्व इतके महत्व ह्यामुळे आहे कि ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू देवनिद्रेस जातात. दक्षिण सागरात शेषनागावर ते देवनिद्रा घेतात. आणि चार महिन्यानंतर देवप्रभोधिनी एकादशी दिवशी ज्या एकादशीला कार्तिकी एकादशी असे देखील म्हण्टले जाते. त्या दिवशी देवनिद्रेतून भगवान श्री हरी विष्णू बाहेर येतात. ह्या चार महिन्यांच्या काळात देवाधी देव महादेवांकडे ह्या सृष्टीचे सांभाळ असतो.

मित्रांनो जर आपल्या देखील काही धन समस्या आहेत जर पैश्यात वाढ होत नसेल, उद्योगधंदा, प्रोमोशन ह्या सगळ्या समस्या आहेत तर आपण देखील ह्या आषाढी एकादशीला काही छोटे उपाय करू शकता. हे उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात. उपाय पहिला या दिवशी आपण भगवान श्री हरीची पूजा पाठ करा किंवा त्यांचे कोणतेही रूप असेल त्यांच्या कोणत्याही एका रूपाचे पूजन मग ते राम असेल, विठ्ठल असेल, श्री कृष्ण असेल त्यांच्या ह्या रूपांपैकी एका रूपाचे आपण पूजन करावे.

तसेच जर तुमच्या घरी दक्षीणावर शंख असेल तर ह्या दक्षणावरील शंखात आपण पाणी भरून किंवा गंगाजल असेल तर गंगाजल त्यात भरून त्याने आपण भगवंतांना जर जलाभिषेख घातला व नंतर आपण देवाकडे काही आपल्या अडचणी असतील त्या अडचणी आपले मागणे मागितले तर आपली इच्छा मागणे भगवंत पूर्ण करतात. भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजनात पिवळ्या रंगाची फुले, फळे त्यांना अर्पण करावीत.

तसेच आपण पिवळ्या ररंगाची मिठाई असेल तर ती देखील आपण त्यांना नैवैद्य म्हणून दाखवीत. फळांमध्ये केळी आहेत मोसंबी आहे अश्या प्रकारे आपण अर्पण करावीत. ज्यांना मोठ्या प्रमाणात धनलाभ व्हावा असे वाटत असेल त्यांनी ह्या आषाढी एकादशीला विष्णूंच्या पूजनासोबत माता लक्ष्मीचे देखील पूजन आपण करावे कारण माता लक्ष्मी ह्या संपूर्ण धानाच्या अधिदेवता आहेत.

मित्रांनो सायंकाळी आपण तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करा हे तूप जर देशी गाईचं असेल तरी अतिउत्तम. आणि जर इतर तूप असेल जसे कि म्हशींचे तर त्यात आपण चिमूटभर हळद टाकून त्या तुपाचे आपण शुद्धीकरण करू शकता. माता तुळशीकडे आपण हाथ जोडून प्रार्थना करा कि आपल्या घराची, आपल्या कुटुंबाचे बरकत व्हावी. अशी प्रार्थना आपण तुळशीजवळ करा. मित्रांनो आषाढी एकादशीला आपण सकाळी पिंपळ वृक्षला आपल्या घरातील एक तांब्या भर जल आपण अवश्य अर्पण करा.

ह्या पिंपळ वृक्षात प्रेत्येक्ष भगवान श्री हरी विष्णू वास करतात. भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करणारा हा सर्वात सोपा उपाय आहे. मित्रांनो आपण ह्या दिवशी थोडेसे कच्चे दूध गाईचे घ्यावे व त्यात आपण केशर टाकून अश्या केशर मिश्रित दुधाने आपण भगवान हरी विष्णूंना अभिषेख करावा ह्यामुळे देखील श्री हरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *