नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. ही वर्षभरातील चोवीस एकादशांमधील सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर झोपी जातात. भागवत संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते.
आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासून आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवतात, कारण मित्रांनो या आषाढी एकादशीचे आपल्या महाराष्ट्र मध्ये त्याचबरोबर संपूर्ण भारतामध्ये खूप महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्यातील काही जण या एकादशीच्या दिवशी विठ्ठलाला आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करत असतात.
मित्रांनो आज आपण असाच एक उपाय पाहणार आहोत आणि हा उपाय जर आपण या एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतीलच आणि त्याचबरोबर भगवान विष्णू यांचा त्याचबरोबर विठ्ठलाचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होईल.
आणि यामुळे आपण हाती घेतलेल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सुख समृद्धी नांदेड तर मित्रांनो कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया.
मित्रांनो सर्वात आधी आपण हे जाणून घेऊयात की या एकादशीच्या दिवशी आपल्याला कशा पद्धतीने आपल्या घरामध्ये पूजा अर्चा करायचे आहे याबद्दलची माहिती.
मित्रांनो देवशयनी आषाढी एकादशी हा दिवस भगवान श्री हरी विष्णू यांचा आहे त्यामुळे संपूर्ण दिवस भर भगवान श्री हरी विष्णू यांचे नामस्मरण नक्की करावे. श्री हरी विष्णूला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात जसे कि पिवळ्या रंगाची फुले, तुशीची पाने, आणि खीर अर्पण अवश्य करावी.
त्याच सोबत श्री विठ्ठलाची सुद्धा पूजा आणि नामस्मरण करावे. “ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ” या मंत्राचा जप पूर्ण झाल्यावर शक्य असेल तर तुळशीला अकरा प्रदक्षणा घालाव्यात जर का शक्य नसेल तर स्वतः भवती प्रदक्षणा घातल्या तरी चालेल. आणि त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या जवळ एक तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला या दिवशी लावायचा आहे.
तर मित्रांनो आता आपण आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दिवशी कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे खोबऱ्याची वाटी मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरामध्ये खोबऱ्याची एखादी तरी वाटी असते.
जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर अशावेळी तुम्ही किराणा मालाच्या दुकानातून एक खोबऱ्याची वाटी या उपायासाठी आणू शकता, आणि त्यानंतर ही वाटी घेऊन तुम्हाला मित्रांनो तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा की आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केव्हाही तुम्ही उपाय करू शकता.
घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल, खोबऱ्याची वाटी घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, आणि मित्रांनो देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला ती खोबऱ्याची वाटी आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती आपल्याला देवघरासमोर बसून देवांना बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर ती वाटी तुम्हाला तिथेच देवघरामध्ये देवी देवतांच्या समोर ठेवायची आहे आणि त्यानंतर ओम भगवते वासुदेवाय नमः ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 21 वेळा किंवा जर शक्य असेल तर 108 वेळा जप तुम्हाला तुमच्या देवघरांमध्ये बसून तिथेच करायचा आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला ती वाटी रात्रभर तिथेच देवघरांमध्ये देवी देवतांच्या समोर ठेवून द्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी मित्रांनो सकाळी उठल्यानंतर आपली दररोजची देवपूजा झाल्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीचे छोटे छोटे तुकडे करावेत आणि घरामध्ये असणाऱ्या सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचे आहे, मित्रांनो अशा पद्धतीने जर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा छोटासा उपाय जर तुमच्या घरामध्ये केला यामुळे तुमच्या मनामध्ये असलेल्या सर्व इच्छा पूर्ण होतील च बरोबर भगवान विष्णू यांचा आणि विठू माऊलीचा आशीर्वाद ही तुमचा तुम्हाला मिळेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.