रोज रात्री झोपताना गुपचूप ‘इथे’ एक तांब्या पाणी, धन वैभव संपत्ती मिळेल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो जर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये बरकत आणायची असेल आणि त्याचबरोबर घरामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक अडचणी संपवायचे असतील तर अशावेळी आपण वास्तुशास्त्राची आणि त्याचबरोबर तंत्र मंत्र शास्त्राची मदत घेऊन काही उपाय आपल्या घरामध्ये केले तर यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात.

मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला असाच एक उपाय पाहणार आहोत हा उपाय मित्रांनो जर अगदी विश्वासाने आणि पुरुष श्रद्धेने आपण रोज करायला सुरुवात केली तर यामुळे आपल्या घरामध्ये असणारे गरिबी हळूहळू नष्ट होईल आणि त्याचबरोबर घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहील त्यामुळे पैशांसंबंधी कोणतीही अडचण येणार नाही.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती, मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला कोणत्याही आर्थिक खर्च करावा लागणार नाही अगदी घरच्या घरी आपण हा उपाय करू शकतो.

मित्रांनो हा उपाय आपल्याला रात्रीच्या वेळी म्हणजे झोपत असताना करायचा आहे मित्रांनो रोज जर झोपण्यापूर्वी आपण हा छोटासा उपाय केला तर यामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय घरामध्ये असणारी कोणतीही व्यक्ती करू शकते परंतु जर शक्य असेल तर घरामध्ये असणाऱ्या महिलेनेच दररोज झोपताना हा उपाय करायचा आहे.

मित्रांनो हा उपाय म्हणजेच आपल्याला रोज तुम्हाला रात्री म्हणजे सात आठ वाजणाच्या दरम्यान एक तांब्या पाणी घ्यायचे आहे. तांब्या स्टीलचा किंवा तांब्याचा तांब्या असला तरी चालेल कोणताही तांब्या तुम्ही घेऊ शकतात. त्यामध्ये शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचे आहे.

पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यामध्ये एक तुळशीचे पान सकाळी तोडून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि रात्री म्हणजेच संध्याकाळी जेव्हा आपण पाण्याचा तांब्या घेऊ तेव्हा त्या तांब्यामध्ये तोडलेलं तुळशीचे पान आपल्याला तांब्यामध्ये टाकायचे आहे. परंतु रात्री तुळशीचे पान तोडायचं नाही सकाळी तोडून ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला रात्री तो पाण्याने भरलेला तांब्या देवघरात एका साईडला एका बाजूला ठेवायचा आहे.

त्यामध्ये हळदी कुंकू अक्षत टाकून त्याचे पूजन करायचे. फुल असतील तर फुले टाकायचे आहे. त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची की, आमच्या घरातील सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व दारिद्र्य, सर्व गरिबी दूर करा. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला दररोज रात्री एक पाण्याचा तांब्या आपल्या देवघरात ठेवायचा आहे आणि रात्रभर तो तांब्या तुमच्या घरातच राहू द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा सगळ्यात आधी अंघोळ वगैरे करा. देवघरात जाऊन नमस्कार करा.

आणि त्यानंतर तो तांब्या घ्या आणि त्या तांब्याने त्या तांब्यातील पाण्याने सूर्यदेवाला अर्घ्य द्या. सूर्यदेवाला ते जल अर्पित करा. तुम्ही नक्की हा उपाय तुम्हाला रोज करा आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य म्हणून समर्पित करा. मित्रांनो अशा पद्धतीने रोज झोपण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये अशा पद्धतीने पाण्याने भरलेला तांब्या ठेवला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर ते पाणी आपल्याला सूर्यदेवतेला अर्पण करायचा आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये अगदी मनाने आणि विश्वासाने करायला सुरुवात केली तर थोड्याच दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये सकारात्मक बदल झालेला तुम्हाला नक्कीच दिसून येईल आणि तुमच्या घरातल्या सर्व अडचणी, सर्व दुःख दूर होतील. तुम्हाला अक्षय पुण्याची प्राप्ती होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *