एकादशीच्या दिवशी नक्की करा तुळशीच्या पानांचा ‘हा’ उपाय : घराची भरभराट होईल!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रांनो 10 जुलै रोजी आषाढी एकादशी आलेली हि एकादशी हिंदू धर्म शास्त्रात ह्याचे फार महत्व आहे. ह्या एकादशीला जी व्यक्ती उपाय करते त्या व्यक्तीच्या जीवनातील संकटे, दुःख, यातना हे भगवान श्री हरी विष्णू नक्की दूर होतात. भगवान श्री विष्णूंच्या कृपेने धन वैभव समाधान शांतता नक्की निर्माण होते. ह्या एकादशीला आपण कोणते उपाय करू शकता हे आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो ज्यांच्या जीवनात पैसा, धन नाही आहे त्या लोकांनी धनप्राप्तीसाठी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील ह्या दिवशी आपण पूजा करायची आहे.

आणि त्याचबरोबर मित्रांनो घरातील दरिद्री नष्ट होते तसेच घरात सुख शांती नांदते. मित्रांनो आपण ह्या दिवशी पूजा करताना त्यांना तुळशीची माळा नक्की अर्पण करा. त्यांना नैवैद्य म्हणून खिरीचा प्रसाद बनवा आणि हि बनवताना एक ते दोन केसराच्या काड्या टाकायला विसरू नका कारण पिवळा रंग भगवान श्री हरी विष्णूंचा रंग आहे. आणि म्हणून त्यांना पिवळ्या रंगाची मिठाई, पिवळ्या रंगाची फळे आपण अर्पण करावीत आणि मित्रांनो जर आपल्या घरात दक्षीणावरती शंख असेल तर ह्या दक्षणीवरती शंखामध्ये गंगाजल टाकून आपण ह्या एकादशी दिवशी भगवान श्री हरी विष्णूंचा अभिषेख करा असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व कष्ट नाहीशी होतात आणि भगवान श्री हारींच्या कृपेने सुख सौभाग्याची निर्मिती होते.

आणि मित्रांनो तुळशीची माळा आपण अर्पण का करावी, कारण तुळस हि भगवान हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तुळशीला विष्णुप्रिया असे संभोधले जाते म्हणून आपण तुळशीची माळा अर्पण केल्याने भगवान श्री हरी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद ते आपल्या भक्तांना देत असतात आणि मित्रांनो ज्यांच्या जीवनात पैस्याच्या बिषयी समस्या असतील तर मित्रांनो आपण भगवान श्री हरी विष्णू सोबत माता लक्ष्मीची संयुक्त उपासना करा आणि सोबतच पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्याच्या बुंध्याशी मनोभावे एक तांब्या जल आपण अवश्य अर्पण करा.

आणि ह्या पिंपळाच्या वृक्षाची ह्या दिवशी मनोभावे पूजा करा अशी मान्यता आहे कि पिंपळाच्या वृक्षात भगवान श्री हरी विष्णू निवास करतात. आणि म्हणूनच आपण ह्या झाडाची पूजा केल्याने त्याला जल अर्पण केल्याने श्री हरी विष्णू प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि मित्रांनो या एकादशीस आपण तुळशीची पाने तोडू नयेत, म्हणून त्याच्या झाडाखाली पडलेली पाने आपण वापरू शकता किंवा ह्या पूर्वी पूजेस वापरलेली पाने देखील आपण पुन्हा धुवून वापरू शकता. मात्र ह्या दिवशी तुळशीच्या पानांना तोडू नयेत.

आणि मित्रांनो जो आपण नैवैद्य आहे त्यावर हि तुळशीपत्र पालथी घालावीत. आणि आपण एक मंत्र सांगत आहोत त्याचा जप आपण १०८ वेळा करायचा आहे. मंत्र आहे ओम नमो भागवते वासुदेवाय ! हा भगवान श्री हरी विष्णूंचा द्वादश मंत्र आहे हाय जप केल्याने त्यांची अस्सीम कृपा आपल्यावरती बरसते. आणि मित्रांनो या एकादशीच्या संपूर्ण दिवसभरात आपण ह्या मंत्राचा जप करा आपल्यावरती भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती नक्की बरसणार.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *