30 मे दर्श सोमवती अमावस्या, संध्याकाळच्या वेळी 21 वेळा बोला ‘हा’ मंत्र : सर्व विघ्न दूर होतील!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

सोमवारी जी अमावस्या येते तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. ह्या सोमवारी येणाऱ्या अमावस्याला खूप महत्व आहे, शास्त्रात आणि उपासनेच्या दृष्टीने देखील ह्या दिवशी काही छोटे उपाय केले तर ह्या दिवशी खूप सारे लाभ आपल्याला मिळू शकतात अश्याच काही उपायांबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत. मित्रांनो ह्यावर्षी जी सोमवती अमावस्या येणार आहे तिची सुरवात दुपारी २ नंतर होणार आहे, तसेच सोमवती अमावस्याची समाप्ती हि सोमवारी संध्यकाळी ५ वाजता होईल.

आणि मित्रांनो ह्या दिवशी आपल्याला काही उपासना आराधना करायची आहे ती ५ वाजूपर्यंत आपण करायची आहे. आपल्याला व्यवसायात काही अडचनी येत असतील काही आपल्या इच्छा असतील त्या जर पूर्ण होत नसतील घरातही काही अडचणी असतील तर ह्या दिवशी महादेवांची उपासना व आराधना करावी असे सांगतिले जाते. म्हणूनच मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. आपल्या जवळपास असलेल्या महादेवांच्या मंदिरात जवून आपण उपासना करायची आहे.

आणि महादेवांना दुधाने किंवा पाण्याने अभिषेख करावा तसेच बेलपत्र अर्पण करून महादेवांना कमीत कमी १ माळ जप करावा, आणि जर शक्य नसेल तर २१ वेळाही जप आपण करू शकता. महादेवांचा जप म्हणजे ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. आणि त्याचबरोबर सुख समृद्धी आणि आरोग्य चांगले प्राप्त होण्यासाठी महादेवांची उपासना करताना आपण आपल्या कुलदेवतेची आराधना व नामःस्मरण आपण करायचे आहे. ज्या मुलामुलींची लग्न जमण्यात अडचणी येत असतील त्यांनी ह्यादिवसापासून ते लग्न जमेपर्यन्त एक माळ जप अवश्य करा. मुलांच्या कल्याणासाठी पालकांनी शिवलीलाअमृतातील ११ वा अध्याय नक्की वाचावा.

आणि तसेच घरात जर आपल्या सतत कोणी तर आजारी पडत असेल तर त्यांनी घरात मृत्युंजय मंत्र अवश्य ऐकावा तसेच त्याचे पठण देखील करावे.ज्या व्यक्तींना सतत आर्थिक अडचणी येत असतात, व्यवसायात प्रगती होत नसते, अश्या लोकांनी महालक्ष्मीअष्टकाचा पाठ आपण शिवमंत्रासोबत आपण अवश्य करावा. ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत पितृदोष आहे त्यांनी ह्या दिवशी पिंपळाच्या झाडाला ११ वेळा प्रदिक्षणा घालून नमस्कार करून तप्रार्थना करायची आहे कि आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळू दे म्हणून. ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी श्री मार्तंड भैरवाय ह्या मंत्राचा जप आपण करायचा आहे.

सोमवती अमावस्याला ह्या दिवशी ज्यांना महादेवांच्या मंदिरात जाणे शक्य नसेल त्यांनी ह्या दिवशी घरात महादेवांच्या पिंडीसमोर किंवा फोटोसमोर बसून जप केला तरी चालेल. ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान केल्याने देखील खूप मोठे फायदे होतात.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *