नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी सोपे तोडगे व उपाय आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो जो मळकट कपडे घालतो, दात स्वछ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो मग तो साक्षात विष्णू देव जरी असला तरी लक्ष्मी त्याला सोडून जाते. एवढेच नाही तर जी व्यक्ती सकाळी सकाळी दररोज उठून सूर्यनमस्कार करते. सकाळी गणपती ची पूजा करून दर्शन घेते तिला आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य व तेजाची प्राप्ती होते. कामनिमत्त एखादि व्यक्ती घरातून बाहेर पडत असेल तर त्या व्यक्तीने तुळशीपत्र तोंडात टाकावे पैशाअभावी अडकलेली तुमची कामे मार्गी लागतील पूर्ण होतील.
घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरलीधर श्री कृष्णाची प्रतिमा भिंतीवर लावावी त्यामुळे तुमहाला कर्ज घेण्याची गरज कधीच येत नाही आणि हो हि प्रतिमा घरच्या पूर्व बाजूच्या भिंतीवर लावा. घरामध्ये सूर्योदय व सूर्यास्ताच्या च्या अगोदर झाडू मारावा, त्यामुळे घरात दारिद्र्य येत नाही. कुलदेवतेचे वर्षातून एकदा दर्शन घावे तिथे जाऊन अभषेक घालावा पूजा अर्चना करावी असे केल्याने तुमच्याकडे पैस्याचा योग सतत वाहत राहील. घरातील केरसुणी किंवा झाडू आणला कि तिला हळद कुंकू लावून तिझी पूजा करून मगच वापरावी तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अश्या जागी ठेऊ नये ती नेहमी भायरचे कोणी तरी घरात आले तर त्यांच्या दृष्टीला पडणार नाही अशी ठेवावी. व तिचा वापर दिवे लावल्यावर करू नये.
घरचा मुख्य द्वार दरवाजा नेहमी स्वछ फडक्याने पुसून ठेवावा. तसेच तिन्हीसांजेला मुख्य दरवाजा नेहमी उघढ ठेवावं कारण लक्ष्मी माता तिन्हीसांजेवेळी घरात येते तेव्हा दरवाजा नेहमी उघडा ठेवावा. आणि तिन्हीसांजेवेळी आपल्या देव्हाऱ्यात दिवा लावावा व धूप किंवा अगरबत्ती लावावी त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न व तेजमय होते.रोज सकाळी पहिली भाकरी गाई ला दुसरी भाकरी कुत्र्याला व तिसरी भाकरी छतावरती पक्ष्यासाठी ठेवावी यामुळे पितृदोष नाहीसा होतो व त्यामुळे होणारे त्रासही नाहीसे होतात.सगळ्यात महत्वाचं म्हणजे वास्तूदोषावर उपाय म्हणून घराची तोडफोड करणे हे शास्त्रसंमत नाही. असे केल्याने सर्वात मोठा म्हणजे वास्तुभंगाचा दोष लागतो.
काटेरी रोपटे घरात लावल्यामुळे त्या घरात राहणारी व्यक्तींना कसल्या तरी प्रकारची उद्दिग्नता येत असते किंवा घरामध्ये अगदी छोट्या छोट्या कारणामुळे वाद होत असतात त्यामुळे अशी काटेरी झाडे घरामध्ये असतील तर ती घरातून काढून टाकावी अथवा ती घरात आनु नयेत.रोख रक्कम हातात पडली कि ती आपल्या देवघरात देवासमोर ठेवावी ज्या दिवशी मिळाली आहे त्यादिवशी त्यातील एक रुपया देखील खर्च करू नये तुम्ही ते पैसे दुसऱ्या दिवसापासून खर्च करू शकता.तर मित्रांनो हे काहि सोपे तोडगे तुम्हाला आपण सांगितले हे नक्की अमलात आना तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच बदल जाणावेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.