नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आज संपूर्ण देशामध्ये स्वामींची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने संपन्न झाली स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्यातील अनेकांनी स्वामींची जशी जमेल तेव्हा पूजाअर्चा केली आहे आणि त्याचबरोबर इथून पुढे ही आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थ स्वामींची सेवा करतीलच आणि मनापासून जे पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामींना शरण जातात त्यांच्यावर स्वामी प्रसन्न होतात. स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहतात स्वामींची योग्य आणि अचूक,नियम पाळून सेवा केली तर आपल्याला त्याच फळ खूप मोठ मिळतं.
परंतु मित्रांनो आज आपण स्वामींच्या एक अशा सेवे विषयी माहिती जाणून घेणार आहोत ही सेवा जर आपण स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून करायला सुरुवात केली तर स्वामी आपल्याला चालतील आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करतील आणि त्याचबरोबर आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून स्वामी आपली सुटका करतील चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणती आहे ही स्वामींची सेवा ज्याची सुरुवात आपल्याला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवसापासून करायची आहे ते.
ही सेवा तुमच्या मनात जर कोणतीही इच्छा असेल तर करा, ही एक सोपी स्वामी सेवा आहे. तुम्हाला बिझनेस करायचा असेल, संतती नसेल, चांगली नोकरी हवी असेल, घर हवं असेल किंवा कोणतीही अडचण असेल किंवा काहीही गोष्टी असतील त्यासाठी स्वामींची सेवा ही स्वामींच्या केंद्रातून, मठातून दिली जाते आणि जर आपण विश्वासाने, मनोभावाने ती सेवा त्या दिवसापर्यंत म्हणजे 21 दिवस ती सेवा आपण विश्वासाने श्रद्धेने मनोभावाने केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि ज्या कार्यासाठी आपण की सेवा करतो ती कार्य सुद्धा आपली पूर्ण होतात.
ही सेवा आहे इच्छापूर्तीसाठी. ही जी सेवा आहे ती तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा करा. तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल. सेवा करण्याआधी हे एक छोटे काम करा. तुम्हाला एक संकल्प सोडायचा आहे, तो संकल्प साध्या सरळ पद्धतीने तुम्ही सोडू शकता, तुम्ही देवघरासमोर बसा आणि एक ताट घ्या, आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि जी ही तुमची इच्छा आहे ती बोला, जे काही तुम्हाला हव आहे ते बोलायचे आहे आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी स्वामी तुमची सेवा करतोय, माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करा किंवा जे हव आहे ते बोलायचं नंतर ते पाणी ताम्हणात सोडावे.
आणि त्यानंतर ते पाणी तुळशीमध्ये टाकू शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवसापासूनच म्हणजेच गुरूवारच्या दिवसापासून तुम्ही हा संकल्प करा आणि गुरुवारपासूनच ही सेवा तुम्ही सुरु करावी. मित्रांनो कमीत कमी २१ दिवस ही सेवा करा. तुमची इच्छा पूर्ण होईल. यासाठी तुम्हाला स्वामींचे सारामृत पारायण करायचे आहे. रोज तीन अध्याय वाचायच आहे. हे पूर्ण 21 अध्याय पारायण असते. रोज तीन तीन अध्याय तुम्ही वाचा, सात दिवसात 21 अध्याय पूर्ण होतील. पुन्हा आठव्या दिवसापासून नवीन तीन अध्याय वाचावेत अशा पद्धतीने नित्यनियमाने दररोज न चुकता 21 दिवसांपर्यंत तुम्हालाही स्वामी सेवा करायची आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो त्यानंतर तुमच्याकडे जर स्वामी समर्थांची नित्यसेवा हे पुस्तक, पोथी असेल तर त्यामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे तो गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला एक वेळेस वाचायचा आहे. सारामृत तीन अध्याय वाचून झाल्यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय रोज नित्यपणे वाचायचा आहे. हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप अकरा माळी किंवा 11 माळी जमत नसतील तर कमीत कमी एक माळ करायची आहे. मित्रांनो तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला या तीनच गोष्टी करायचे आहेत. मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करा. जी इच्छा असेल ती पूर्ण होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.