नमस्कार मित्र मैत्रिणींनो
मित्रांनो २८ एप्रिल गुरूवार हा दिवस खास स्वामीभक्तांसाठी खास दिवस आहे कारण मित्रांनो ह्या दिवशी स्वामी समर्थांची पुण्य तिथी आहे. मागेच स्वामी समर्थांची जयंती साजरी केली त्यावेळी आपण स्वामींची विशेष सेवा केली व त्यांना प्रसन्न केले. मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी आहात तुमचा स्वामींवर विश्वास आहे तर तुम्हाला २८ एप्रिल २०२२ स्वामींची पुण्यतिथी ह्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्ही हा एक मंत्र बोलायचा आहे आणि या गुरूवारच्या दिवशी तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे ही सेवा करून झाल्यावर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे, तो बोलल्याने तुमच्यावरती स्वामी प्रसन्न होतील.
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुम्हला जे हवे ते सर्व काही देतील. तुमचे सर्व दुःख संकटे दूर करतील. फक्त उठल्याबरोबर अगदी अंथरुणातच बसून तुम्ही हा एक मंत्र बोलायचं आहे. हा मंत्र आपण १ वेळा ११, २१, १०८ जितक्या वेळा बोलता येईल तितक्या वेळा बोला. चला तर आपल्या आजच्या लेखात जाणून घेउयात हा मंत्र कोणता आहे, मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतच आहे की गुरुवारचा दिवस हा स्वामी समर्थांचा अत्यंत प्रिय दिवस आहे आणि त्याचबरोबर स्वामींची पुण्यतिथी ही योगायोगाने गुरुवारच्या दिवशीच आली आहे.
आणि त्याचबरोबर मित्रांनो गुरुवार हा स्वामींचा आवडता वार मानला जातो. या दिवशी स्वामींची विशेष अशी पूजा केली जाते. त्यांचे विशेष अशी आराधना केली जाते. त्यांना विशेष असे नैवेद्य दाखवला जाते व विशेष असे मंत्रजप देखील केला जातो. आरती देखील म्हटले जाते. गुरुवारी 21 वेळेस जर आपण हा मंत्र बोलला तर स्वामींचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला मिळेल. हा मंत्र कोणता? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी पूजेच्या वेळेस हातपाय होऊन देवघरासमोर बसावे. देवाजवळ दिवा लावावा. अगरबत्ती लावावी. हात जोडून स्वामींना आपल्या घरातील सुख-समृद्धीसाठी, बरकतीसाठी, दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा या मंत्राचा जप 21 वेळेस करावा.
हा मंत्र जाप करत असताना मना मध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा न बाळगता निस्वार्थ मानाने या मंत्राचे जप करावे. अत्यंत मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप करावा. कारण कोणत्याही सेवेचे फळ हे जर आपण निस्वार्थ मनाने सेवा केली असेल तरच मिळत असते. कोणत्याही स्वार्थी भावनेने मनामध्ये इच्छा बाळगून जर आपण सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही.
हा मंत्र जप तुम्ही गुरूवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी एकवीस वेळेस करावा. नक्की तुम्हाला त्याचे फळ मिळेल. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. स्वामींची कृपादृष्टी तुमच्याबरोबर तुमच्या घरावर होईल. स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील. तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देणार नाहीत. घरामध्ये सुख शांती निर्माण होईल. धनधान्य मध्ये बरकत होईल. तुम्ही देखील हा उपाय करून बघा. नक्कीच मला त्याचा फायदा झालेला दिसून येईल.
वरील माहिती विविध स्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.