चैत्र नवरात्र संपण्याआधी कुलदेवतेची ‘अशी’ भरा ओटी : घरात धनसंपत्ती येईल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

मित्रांनो भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चार प्रकारची नवरात्र वर्षभरात साजरी केली जातात. नवरात्रात दोन नवरात्र प्रकट तर दोन नवरात्र गुप्त पद्धतीने साजरी केली जातात. दोन प्रकट नवरात्रांमध्ये चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र यांचा समावेश आहे. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असल्यामुळे या नवरात्राला वासंती नवरात्र असेही म्हणतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो अशी ही चैत्र नवरात्र 2 एप्रिल पासून दहा एप्रिल या दिवसात पर्यंत आहे, मित्रांनो अशी ही चैत्र नवरात्र गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र महिन्यातील चैत्र नवरात्र उत्सव म्हणजेच नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झाली आहे आणि हे चैत्र नवरात्री चे नऊ दिवस संपण्याआधी आपल्याला आपल्या घरांमध्ये किंवा शक्य असेल तर आपल्या कुलदेवतेच्या मंदिर मध्ये जाऊन तिची ओटी भरायची आहे मित्रांनो छोटासा उपाय जर आपण या चैत्र नवरात्री च्या वेळी केला तर यामुळे आपली कुलदेवता
आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही.

अशा या दिवसांचा आपल्याला चांगला उपयोग करून घेऊन चांगल्या वस्तू दागदागिने घर बंगला गाडी अशा वस्तु तर खरेदी करता येतीलच. मात्र याच बरोबर एक उपाय देखील करता येईल की ज्यामुळे आपल्या घरात भरभराटी येईल सुख समृद्धी नांदेल यश नेहमीच तुमच्या पदरी पडेल.

मित्रांनो चैत्र नवरात्रीमध्ये म्हणजेच 2 एप्रिल पासून दहा एप्रिल पर्यंत हा चैत्र नवरात्रीचा उत्सव असणार आहे. आणि नवरात्र म्हणजे देवीचा सण हे नऊ दिवस देवीचे असतात. म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या कुलदेवता मातेची म्हणजेच अंबाबाई, यल्लमा, महालक्ष्मी, मरीआई, अशा प्रकारच्या ज्या माता असतील ज्या आपल्या कुलदैवताच्या असतील त्यांची ओटी भरावी.

ओटी भरताना छानस हिरवे कापड किंवा साडी, गहू किंवा तांदूळ, नारळ, सुपारी असे सर्व साहित्य घेऊन भरगच ओटी भरावी. ओटीत अकरा रुपयाची दक्षिणा ठेवावी.म्हणजेच घरच्या घरी ओटी भरताना एका ताटामध्ये हि ओटी भरून आपल्या घरातील देव्हाऱ्याजवळ किंवा जिथे माता किंवा देवीचा फोटो असेल प्रतिमा असेल त्याठिकाणी ही ओटी ठेवायची आहे.

ही ओटी या दिवशी दिवसभर येथे ठेवायचे आहे. त्यानंतर रात्रभर देखील येथे ठेवायची आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी या बोटीतील जी साडी किंवा कापड असेल ते घरच्या प्रमुख महिलेने स्वतःसाठी वापरावे तसेच याच्या ती नारळ घरातील गोड जेवण किंवा नैवेद्य बनवताना वापरावा.
आणि कोटीतील जी दक्षिणा आपण ठेवला होता ती आपण पैसे ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी तशीच पुढे बांधून ठेवून द्यायचे आहे. यामुळे आपल्या घरात पैशाला पैसा जोडला जाईल बरकत येईल.

नव वर्षाच्या सुरुवातीलाच आणि नवरात्रीच्या सुरुवातीला आपण हा तोटका करत असल्याने साहजिकच आपली माता आपल्यावर प्रसन्न होईल. माता लक्ष्मी देखील प्रसन्न होईल आणि आपणाला निश्चित असे यश मिळत राहील.

नव्या वर्षात आपली नोकरी मध्ये बढती होईल, व्यवसाय मध्ये चांगली वाढ होईल. येणारा पैसा चौपट वाढून येईल. घरात नेहमी सुख समृद्धी शांती राहील. आणि त्याचबरोबर मित्रांनो चैत्र नवरात्र मध्ये आपण आपल्या कुलदेवतेला जी ओटी भरणार आहेत ती ओटी विवाहित स्त्रियांनीच भरावी. ही मुख्य गोष्ट लक्षात ठेवावी. ओटी भरून पूजा करताना मनोभावे प्रार्थना करावी मनोभावे नमस्कार करावा. आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा.

वरील माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित करण्यात आली आहे. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *