नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
नारायण नागबली हा शब्द काहींना माहित असेल.किंवा काही ना ऐकून माहित असेल.काही लोकांनी त्याचा विधी देखील केला असेल. तर काही लोकांना ऐकून माहित असेल.नारायण नागबली विधी का करावा कशासाठी करावा काय गैर समज आहेत या बद्दलच आपण माहिती जाणून घेणार आहोत.
नारायण नागबली हा विधी घराण्याच्या वंशाचा पितृदोष निवारण्यासाठी केला जातो.हा विधी तीन दिवसांचा असून पती पत्नी या दोघांनी मिळून करायचा असतो.विवाह न झालेला मुलगा तसेच पाच वर्षाखालील मुंजन न झालेला मुलगा आपले आई वडील हायात झालेलं आसतीतल तर हा विधी करू शकतात.
पत्नी देखील सासरी येताना माहेरचा पन्नास टक्के पितृदोष घेऊन च येते.त्यामुळे सासर कडच्यानी मुलीच्या भावा कडून किंवा आई वडिलां कडून हा विधी करून घेणे महत्वाचे ठरते. नारायण नागबली विधी बाबत बरेच गैर समज आहेत.हा विधी करत असताना घरातील जेष्ठ व्यक्तीनेच करायाला पाहिजे.
किंवा संबंधित कुटुंब किंवा आई-वडील यांनी च करायला पाहिजे. कुटुंब नियमित श्राद्ध विधि करत असेल तर नारायण नागबलि विधि करणे आवश्यक आहे. कारण नारायण नागबलीच्या संबंधित जानता अजाणता किंवा दुसऱ्या जातीतील लोकांना छळ करून जे श्राप घेतलेले आसतात. ते छळ आणि अण्याय त्या मुळे ते स्व जातीचे किंवा मृतआतम्याचे पूर्वजा पासून जे छळ आसतात ते या पासून मुक्त होतात.
त्यामुळे आम्ही दरवेळी श्राद्यविधी करतो. मग नारायण नागबली विधी करण्याची आवश्यता नाही असे बोलणे चुकीचे आहे.हे जर लोकांनी योग्य रीतीने समजून घेतले नाहीतर ते कुटूंब फूडच्या वंशाच्या पिढीच्या हानी साठी जबाबदार ठरेल.यकदा नारायण नागबली विधी केली असेल तर पुन्हा करण्याची गरज नाही ही समजूत चुकीची आहे.
कारण कुटुंबाच्या शांत करणावर आधिकर करणाऱ्या शास्त्रानुसार अनेकानेक त्या कुटुंबाचे नातेवाईक असतात.पहील्या नारायण नागबली त काही मृतआतम्यांनी पिंड स्वीकारलेले नसतात. तर त्यांनी हा नारायण नागबली हा विधी पुन्हा करावा नात्यागोत्यात जन्म मृत्यू ह्या घटना चालूच आसतात.त्यामुळे ही समज चुकीची आहे की एकदा नारायण नागबली केली की परत करायची गरज नाही.
नारायण नागबली करून आल्यावर आपण ज्याच्या घरी अन्न ग्रहण करतो त्यांच्या कडे ते नारायण नागबली चे पुण्य जाते असे समजले जाते.त्यामुळे नारायण नागबली विधी करून आल्यावर आपण आपल्या घरीच अन्न ग्रहण करायचे.त्यामुळे शक्यतो जेवण आपण आपल्या घरीच करावे.म्हणजे ते परअन्न किंवा तेचा दोष लागू होणार नाही.
जर विधी करून येताना बाहेरचे अन्न खाणे गरजेचे च आसेल.तर ते आपल्या पैशाचे च खावे. नारायण नागबली विधी करून आल्या नंतर सात महिन्यात सात श्री गुरु चरित्राचे पारायण करावे. आणि स्वामींची नित्य सेवा म्हणजे आकरा माळी जप आणि श्री स्वामी समर्थांचे तीन आध्याय रोज वाचावे ही नित्य सेवा रोज झालीच पाहिजे.
पितृदोष निवारनासाठी त्रांबकेश्र्वर वरून नारायण नागबली ची विधी करून आल्यानंतर कोणत्या सेवा करायच्या ते पुढील प्रमाणे.
नारायण नागबली विधी करून आल्या नंतर परअन्न जे आहे ते ऐक वर्ष खायचं नाही ते टाळायचे आहे.नंतर सात महिन्यात सात गुरुचरित्र जे आहे ते पारायण करण्याचा प्रयत्न करायचा आहे.त्यानंतर नारायणा नागबली विधी करून आल्यानंतर श्राद्धविधी पंचमहायज्ञ हिरण्यादान या सारख्या विधी करायचे आहेत.
त्यानंतर सूर्य मंत्र आणि अदित्यरुधय स्तोत्र म्हणावे. सूर्य मंत्राने जे दोष आहेत ते निघून जातात. सहा महिन्यांत सव्वा लाख गायत्री ऐक प्रणम सव्वा लाख महामृत्यूजय ऐक प्रणम बारा लाख श्री स्वामी समर्थ जप करावा. नारायण नागबली करून आल्या नंतर ऐक वर्षात केव्हाही श्रीमंत भागवत सप्ताह पारायण विधी वर सप्ताह करावे. दानधर्म अन्नदान झाले पाहिजे आणि नित्य नियमाने नेवेद्य दाखवावे.
वरील माहिती स्त्रोताच्या आधारे एकत्रीत करण्यात आली आहेयाचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमची पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.