दही घरात आणताना करू नका ‘ही’ एक चूक : अन्यथा भयंकर दारिद्र्य, गरिबी येऊ शकते : लक्ष्मी, अलक्ष्मी विशेष माहिती

नमस्कार मित्र मैत्रिणींनो,

मित्रमैत्रिणींनो, आपण घरी दही आणताना ही एक गोष्ट अवश्य टाळा अन्यथा आपल्या घरात भयंकर गरिबी आणि दारिद्र्य येऊ शकते. तसेच आपल्या कुटुंबात आणि आयुष्यात मोठ्या संकटाचे देखील आगमन होऊ शकते. त्यामुळे ह्या एका गोष्टीची आपण अवश्य काळजी घ्यायला हवी. मित्रांनो यामागे एक पौराणिक कथा आहे सर्वात आधी ती कथा आपण जाणून घेऊया, हिंदु धर्मशास्त्रानुसार जेव्हा समुद्रमंथन झाले, तेव्हा ह्या समुद्रमंथनातून लक्ष्मी व अलक्ष्मी प्रकट झाल्या.

आणि त्यामधील लक्ष्मी म्हणजेच ज्या ज्या गोष्टी शुभ आणि मंगल आहेत, धन , संपत्ती, वैभव, ऐश्वर्य ह्या सर्व गोष्टींचा संबंध लक्ष्मीशी असतो. याउलट , अलक्ष्मी म्हणजे दुःख, दारिद्र्य, क्लेश, वादविवाद. ज्या ज्या ठिकाणी अमंगल गोष्टी असतात त्या सर्व गोष्टी अलक्ष्मीशी निगडित आहेत.
आज आपण ज्या वस्तूबद्दल बोलणार आहोत ती वस्तू म्हणजे दही. दही हे माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणूनच दह्याचा वापर अनेक टोटके करण्यासाठी केला जातो.

मित्रांनो नकळत काही वेळा आपल्याकडून ह्या दह्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी घडतात. आपण ह्या प्रकारच्या चूका केल्या तर आपल्या घरात अलक्ष्मीचा वास होतो आणि त्याच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकत नाही. ज्या ठिकाणी अलक्ष्मी असते, त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास होत नाही. भगवान श्री विष्णूंनी लक्ष्मी आणि अलक्ष्मीस असे वरदान दिले आहे की ह्या दोघी रोज पृथ्वीतलावर भ्रमण करतील. प्रत्येक घरात लक्ष देतील. ज्या घरात नेहमी देवपूजा होत असेल, मोठ्या लोकांचा आदर होत असेल, आदरभावनेने एकमेकांशी वागत असतील तर त्या घरात माता लक्ष्मीचा वास होईल.

म्हणूनच याउलट ज्या घरात सतत वादविवाद होत असतील, एकमेकांच्या उणिवा काढल्या जात असतील, ज्या घरात नेहमी देवपूजा होत नसेल, लोक अधर्माने वागत असतील, स्त्रियांचा अपमान होत असेल, अशा घरात माता अलक्ष्मी, म्हणजेच गरिबी, दारिद्र्य अवश्य प्रवेश करेल. त्यासोबतच ही एक छोटीशी चूक लक्षात घ्या. जर आपण दह्यासोबत ह्या गोष्टी घरी घेऊन आलो तर आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही. हिंदुधर्मशास्त्रानुसार दूध आणि दही हे दोन पदार्थ एकत्र आपल्या घरात आपण आणू नये.

मित्रांनो जेव्हा तुम्ही बाजारातून दही खरेदी कराल, तर दह्यासोबत जर तुम्ही दूध खरेदी केले तर एकाचवेळी ह्या दोन पदार्थांचा प्रवेश आपल्या घरात होता कामा नये.

ज्या घरात दूध आणि दही एकत्रित रित्या एकाच पिशवीमधून घरात आणले जाते तेव्हा त्या घरात वास्तुदोष उत्पन्न होतात. घरात असलेला पैसा खर्च होऊ लागतो. घरातील सुख समृद्धी नाहीशी होऊ लागते व परिणामी आपल्या घराची बरकत थांबते व फार मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते, ज्यावेळी आपण खरेदी करतो त्यावेळी आपल्याला त्याचा सोबत दही आपल्या घरांमध्ये आणायचं नाही आणि ज्या वेळी दही खरेदी करतो त्यावेळी दूध आपल्या घरामध्ये आणायचं नाही.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *