महाशिवरात्रीचा उपवास का व कसा करावा?

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो महाशिवरात्री दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान महादेवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.या संदर्भातील माहिती आज आपण आजच्या या विशेष लेखांमध्ये घेणार आहोत.

महाशिवरात्री म्हणजे?
मित्रांनो महाशिवरात्रि म्हणजे काय हे आधी आपण पाहू… पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात. 

महाशिवरात्री हा उपवास का करावा? : 
मित्रांनो भगवान शंकरांच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी-अवस्थेत जातो. शिवाची समाधी-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही.  त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.

कसे करावे महाशिवरात्रीचे व्रत:
मित्रांनो, महाशिवरात्रीचे हे व्रत करताना उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात.

यानंतर मित्रांनो, तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.

या व्रताचे वैशिष्ट

शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.

शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. 

शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.

शिवाक्षाला तांदूळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात. 

शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.

महाशिवरात्रीला भगवान शंकरांचे नामजप करण्याचे महत्त्व :
मित्रांनो महाशिवरात्रीला भगवान शंकरांचे नामजप करण्याचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीत जास्त करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *