गुरुचरित्रामधील फक्त ‘हा’ एक अध्याय, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल!

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो

मित्रांनो, आपल्यातील बरेच लोक घरातील गरिबी दूर करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात आणि त्याच बरोबर घरात सुख समृद्धी नांदावी घरात पैसा खेचला जावा आणि घरामध्ये वाद-विवाद होऊ नये यासाठी ही स्वामी समर्थांची पूजा-अर्चा आणि त्यांच्या नामाचा जप करत असतात. वेगवेगळे उपाय करत असतात.

परंतु मित्रांनो यातील काही लोकांच्या या समस्या संपतच नाहीत कारण या लोकांना त्यांच्या नशिबाची, भाग्याची साथ मिळत नसते. परंतु मित्रांनो आज आपण स्वामी समर्थांची अशी एक सेवा पाहणार आहोत की, ज्यामुळे आपले नशीब देखील आपल्याला साथ द्यायला सुरुवात करेल आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील.

स्वामी समर्थांचे अनेक सेवेकरी स्वामी समर्थांना प्रसन्न प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी यासाठी दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपले देवघरामध्ये जाऊन दररोजची देवपूजा करून झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात.

यामध्ये हे भक्त स्वामी समर्थांच्या प्रतिमेला अभिषेक घालून त्याला पुष्पहार अर्पण करून अष्टगंध लावतात आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिमेला फुले अक्षता वाहतात. त्यानंतर तिथेच स्वामी समर्थांच्या समोर बसून त्यांच्या तारक मंत्राचा जप करत असतात आणि सर्वात शेवटी स्वामी समर्थांची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवतात.

अशाप्रकारे दररोज सकाळी स्वामी समर्थांची पूजा हे लोक करत असतात परंतु ही पूजा करत असतानाच त्याचबरोबर स्वामी समर्थांची आणखी एक विशेष सेवा जर आपण केली तरी यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर लगेच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा दूर करतील आणि सर्व समस्यांतून आपले रक्षण करतील. ही सेवा करत असताना आपल्याला गुरुचरित्र मधील एका अध्यायाचे वाचन करायचे आहे. मित्रांनो गुरुचरित्र मधील प्रत्येक अध्याय हा विविध समस्यांसाठी अगदी फायदेशीर आहे त्यामुळे आपण एकदा तरी संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचे वाचन केलेच पाहिजे.

मित्रांनो हे गुरुचरित्र पारायण फक्त सात दिवसांचे असते, परंतु गुरुचरित्र मधील हा एक अध्यायाचे वाचन जर आपण सकाळच्या वेळी किंवा रात्री झोपताना केले तर यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांची ही कृपा आपल्यावर राहते.

परंतु शक्यतो मित्रांनो ह्या एका अध्यायाचे वाचन आपल्याला सकाळच्या वेळी आपली देवपूजा झाल्यानंतर तेथेच स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसूनच करायचे आहे यामुळे याचा चांगला फायदा आपल्याला मिळतो. त्याचबरोबर हा अध्याय वाचत असताना तुम्हाला त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लक्षात घेऊनच याचे वाचन करायचे आहे.

सकाळच्या वेळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसून तिथे दिवा अगरबत्ती लावून याचे वाचन तुम्हाला करायचे आहे आणि याचे वाचन करण्यासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र पारायण असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मित्रांनो स्वामी समर्थांचे गुरुचरित्र पारायणाचे पुस्तक तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या स्वामी समर्थांचे केंद्रामध्ये सहज मिळेल आणि त्याचबरोबर तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन देखील मागवू शकता. अशा पद्धतीने ज्यावेळी तुम्ही गुरुचरित्र पारायणाची पुस्तक तुमच्या घरामध्ये अनाल त्यावेळी तुम्हाला यामधील नववा अध्याय दररोज सकाळच्या वेळी किंवा ज्या वेळी हे तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी वाचायचा आहे.

मित्रांनो दररोज एकदा हा नंबर चा अध्याय तुम्ही जर अगदी मनापासून आणि श्रद्धेने वाचायला सुरुवात केली तर यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होते आणि त्याचबरोबर स्वामी समर्थ हे तुमच्यावर प्रसन्न होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *