घराचे भाग्य बदलायचे आहे तर स्त्रियांनी करावे रोज हे एक काम घरात कधीही पैसा कमी पडणार नाही!

नमस्कार मित्र मैत्रिणींनो

मित्रांनो आपल्यातील प्रत्येक जण आपल्या घरातील गरिबी दूर व्हावी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावे त्याचबरोबर आपल्या घरात वादविवाद होऊ नयेत घरातील सर्व व्यक्तींची आरोग्य निरोगी रहावे यासाठी कष्ट करत असतात आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्राचे मदत घेऊन काही घरगुती उपाय घरामध्ये करत असतात. मित्रांनो आज आपण आपल्या शास्त्रांमध्ये घरातील महिलांसाठी सांगितलेला असा एक उपाय पाहणार आहोत की जर तो उपाय घरातील विवाहित महिलांनी केला तर यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये पैसा खेचला जाईल.

स्वामींना आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी असते त्यामुळे ते आपल्या भक्तावर आलेल्या प्रत्येक संकटावर ऊन त्याची सुटका करत असतात, म्हणूनच आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांची अगदी मनापासून पूजा-अर्चा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचे नामस्मरण केले तर यामुळे त्यांची कृपा आपल्यावर अखंड राहील आणि आपल्या सर्व समस्या स्वामी समर्थ दूर करतील. मित्रांनो आज आपण असाच एक घरातील विवाहित स्त्रियांनी करायचा उपाय पाहणार आहोत की त्यामुळे स्वामी समर्थ आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील त्याचप्रमाणे आपल्यावर आलेल्या संकटापासून आपले रक्षण ही करतील.

जर स्त्रियांनी हा उपाय केला तर त्यामुळे तिच्या पतीचे त्याचबरोबर त्यांच्या मुलांचे भाग्य बदलेल आणि त्यामुळे त्यांच्या घरांमध्ये कशाचीही कमतरता भासणार नाही. हा उपाय स्त्रियांनी सकाळच्या वेळी करायचा आहे. घरातील विवाहित स्त्रियांनी सकाळच्या वेळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपली देवघरातील पूजा करून झाल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करत असताना त्या महिलेने देवपूजा झाल्यानंतर एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चार ते पाच तुळशीची पाने टाकावित.

त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरामध्ये जेवढ्या रूम असतील त्या रूममध्ये त्याच तुळशीच्या पानांनी शिंपडायचे आहे, हे पाणी घरांमध्ये शिल्लक असताना आपल्याला भगवान श्री विष्णू च्या मंत्रांचा जप करायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे, “ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप तुम्हाला मनातल्या मनात हळुवारपणे करत ते पाणी संपूर्ण घरांमध्ये शिंपडायचे आहे.
दररोज सकाळी तुमच्या देवघरातील देव पूजा झाल्यानंतर तुम्हाला वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये चार ते पाच तुळशीची पाने घालून ते पाणी संपूर्ण घरांमध्ये वरील मंत्राचा जप करत शिंपडायचे आहे.

तुळशीच्या पानांमुळे घरातील नकारात्मकता निघून जाईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल, त्याचबरोबर घरातील वातावरणही प्रसन्न राहील. जर तुमची काही कामे अपूर्ण राहिली असतील तर दररोज हा उपाय जर घरातील स्त्रियांनी केला तर सर्व अपूर्ण राहिलेली कामे ही लवकरात लवकर पूर्ण होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *