नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्र-मैत्रिणीनो दोन व्यक्तींचे लग्न हे भारतीय परंपरेतील सर्वात मोठी परंपरा आहे. पवित्र अग्नी समोर संपूर्ण आयुष्य एकत्र घालवण्यासाठी दोन व्यक्ती तयार होतात. ही प्रथा आता भारतापुरतेच मर्यादित राहिलेली नाही. या प्रथेचे अनुकरण पाश्चात्त्य देशांमध्ये देखील केले जाते. मात्र या भल्यामोठ्या जगामध्ये भरपूर व्यक्ती आहेत. त्याच प्रमाणे तेवढ्या प्रवृत्ती देखील आहेत. अनेकांना लग्न म्हणजे बंधन वाटते, तर काहींना आपले आयुष्य बदलणारी एक चांगली घटना वाटते. आपल्या राशीचक्रामध्ये बारा राशी आहे. व त्या राशीच्या व्यक्तींचे स्वभाव देखील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या बारा राशींपैकी या चार राशी लग्नासाठी नेहमी तयार असतात.
1) वृषभ रास- या राशीच्या लोकांना आयुष्यामध्ये स्थिरता खूप महत्त्वाची वाटत असते. व आपण सुरक्षित रहावी अशी भावना त्यांच्या मनामध्ये असते. आणि आपण लग्न केल्यानंतर सुरक्षित रहाणार आहे. असे या राशीच्या लोकांना वाटत असते. त्यामुळे या राशीचे लोक लग्नासाठी सदैव तयार असतात. लग्नासाठी जर योग्य जोडीदार भेटला तर ते मागे हटत नाहीत. व या राशीचे लोक निष्ठावंत असतात.
व ते आपल्या जोडीदाराशी तितकेच प्रामाणिक देखील असतात. ते आपल्या जोडीदाराला बंधनामध्ये ठेवत नाहीत. त्याचबरोबर ते आपल्या जोडीदाराला मान सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. व आपल्या जोडीदाराबरोबर सुखी आणि समृद्धी जीवन जगणे पसंत करतात.
2) कर्क रास- या राशीचे लोक कुटुंब भिमुख असतात या राशीच्या लोकांना आपले कुटुंब म्हणजे सर्व काही आहे. असे वाटत असते. त्यांना कुटुंबामुळे दुसरे काहीही दिसत नाही. ते आपल्या कुटुंबास संदर्भात संवेदनशील असतात. आयुष्यातील प्रत्येक चढ-उताराचा मध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा जोडीदार हवा असतो. ते आपल्या जोडीदाराशी खूप प्रामाणिक असतात. व ते त्यांच्यावर खूप प्रेम देखील करतात .त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर त्यांचा जोडीदार सदैव सोबत असावा असे वाटत असते. त्यामुळे ते आपल्या जोडीदाराला कधीही एकटे सोडत नाहीत.
3)तुळ रास- या राशीचे लोक वास्तववादी पेक्षा आदर्शवादी असतात लग्न या संकल्पनेस असते. खूप आनंदी असतात त्यांना लग्न म्हणजे खूप आनंदाची गोष्ट वाटत असते. या राशीच्या लोकांना प्रामाणिक जोडीदाराची गरज असते. व ते प्रामाणिक जोडीदार मिळाला तर त्या व्यक्तींसोबत ते वचन बद्दल राहतात. या राशीच्या व्यक्ती आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात. प्रेम या संकल्पनेवर त्यांचा खूप खूप विश्वास आहे. तूळ राशीचे लोक प्रेमविवाह देखील करतात. कारण त्यांचा प्रेमावर खुप विश्वास आहे. आणि या राशीच्या लोकांसाठी लग्न म्हणजे खूपच आनंदाची गोष्ट आहे. प्रेमळ व्यक्तींचा आदर्श या राशीचे लोक सदैव घेतात.
4) वृश्चिक रास- या राशीचे लोक निष्ठावान असतात प्रेम आणि आपुलकीने बांधील असलेल्या व्यक्तींशी संबंध ठेवायला या राशीचे लोक सदैव तयार असतात. त्याचबरोबर या राशीचे लोक इतरांच्या मनाचा देखील विचार करतात. कोणालाही आपल्यामुळे त्रास होणार नाही. या पद्धतीचे त्यांचे वर्तन असते. या राशीचे लोक आपल्या जोडीदाराला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या प्रकारे आपले जीवन जगतात. व आपल्या जोडीदाराच्या हिताचे सदैव रक्षण करत असतात. आपल्या जोडीदाराला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. याची दक्षता ते सदैव घेत असतात. व आपला जोडीदार सदैव खुश राहावा यासाठी ते धडपडत असतात.
मित्रांनो हि माहिती विविध स्रोतांची आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशा प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.